Sunday, November 22, 2015


Ayush Herb Web Bootstrap Example मी लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला, पुढील लिखाण घेऊन प्रस्तुत होणार आहे. मी वाट बघत होतो कि खरेच किती जिज्ञासू हे वाचत आहेत ते कळावे, जे मला कळावे असे वाटत होते ते कळले आहे. तरी पुढील लिखाण लवकरच प्रसिद्ध होईल.

Sunday, October 18, 2015


पान नंबर २१ व २२
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 21
  कृपया हिकडे लक्ष्य द्यावे!
इलेक्ट्रिक, हि आपल्या रोजच्या वापरातली "वस्तू" नव्हे "उर्जा" आहे.आपण असे समजतो, आपली कमाई आहे, तर आपण कितीहि विजेचा वापर करू शकतो, व तो हक्क आपल्याला आहे. पण खरेच तसे आहे का?
कदाचित असे तर नाही? कि, आपण त्या गोष्टीतल्या राजासारखे, तो राजा, जेथे हात ठेवेल, त्याचे सोने झाले, आणि शेवटी त्यालाच धाय मोकलून रडावे लागते, म्हणजेच आपल्या देशांत, आपण निष्कारण वीज, आणि विजेसारख्या अन्य गोष्टी योग्य रीतीने न वापरता बेशुमार वापरून आपल्याच अधोगतीला आपण स्वतःच जबाबदार होतो?
भारतामध्ये अजूनही अपारंपारिक पद्धतीपेक्षा, (काही राजनीतिक कारणाने) पारंपारिक पद्धतच (उर्जा स्त्रोत) वापरावा लागतो. हे नैसर्गिक स्त्रोत, पूर्वी म्हणजे १९९८ साली, जेव्हढे होते, तेव्हढेच आजही आहेत, कदाचित काही कारणांने त्यांत बिघाड झाला, तर मात्र वीजनिर्मिती कमी होते, परंतु वीजनिर्मिती वाढवण्याचा एकही प्रशस्त मार्ग अजूनपर्यंत आपल्याला सापडलेला नाही.
असे असतांना, विचार करा, १९९८ सालापासून आज २०१५ सालापर्यंत, आपण किती वीज उपयोगी वस्तू आपल्या वापरामध्ये वाढवल्या? व त्याच्यावर आज अवलंबून आहोत. तसेच किती घर वाढली? किती लोकसंख्या वाढली? किती कार्यालय व किती कारखाने वाढले?
आपल्याला असे वाटते का? कि उद्योगधंदे वाढू नयेत, रोजगार निर्मिती होऊ नयेत? आपली मुले शिक्षित असून देखील बेरोजगार रहावीत. आपले जीवन चांगले गेले, बास झाले, येणाऱ्या पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या पिढीचा नाश झाला तरी चालेल, मी मात्र आहे, तसंच वागणार व रहाणार? व त्यांच्या नाशाला कारणीभूत होणार?
आज वस्तुस्थिती अशी आहे, कि मागणीपेक्षा पुरवठा फक्त निम्माच आहे. अशा अवस्थेत आपण असतांना, आपण बेफिकीर रहातो, हे कितपत योग्य आहे? उद्या अशी अवस्था निर्माण झाली, कि पैसा आहे पण वापरायला वीज नाही, रात्री मुलांच्या आभ्यासाला लाईट नाही, तर आश्चर्य वाटण्याचे कारणच नाही. कारण जे झाले, जे होत आहे, त्याला आपणच जबाबदार नाही का?
सत्गुरू म्हणजे काय?
    ला तर आता हि योग्य वेळ आली आहे, सत्गुरू म्हणजे काय? हे पूर्णपणाने माहित करून घेऊया! तसे बघायला गेले तर ह्यापूर्वीच ह्याचे सुतोवाच झालेले आहे, आपणाला आठवण करून देतो, ज्यावेळेस परमेश्वराने कलीला शिष्य संदीपकची कथा सांगितली त्यामध्ये सत्गुरूचे वर्णन केले होते, परंतु आपण त्याला, त्याच्या मूळ अर्थापासून नीटपणे व व्यवस्थित समजून घेतले तर एकंदरीत फारच बरे होऊन, मन दृढ होण्यास अधिक मदतच होईल.
    हे सहजसाध्य होण्यासाठी, सर्वसाधारणपणे आपण आपल्या आयुष्यापासून सुरवांत करू, आपण ज्यावेळेस लहान होतो, प्रथमच शाळेत जाऊ लागलो, आपल्याला आपल्या शिक्षकांची ओळख झाली, इथे शिक्षक म्हणजेच "गुरु" हा शब्द फार पूर्वी म्हटला जायचा. आता गुरु म्हणजे काय? ते प्रथम पाहू. "गु" ह्या शब्दाचा अर्थ होतो "अंधःकार," आणि "रु" ह्या शब्दाचा अर्थ होतो "प्रकाश." आता ह्या दोन्ही शब्दांचा मिळून असा अर्थ होतो, कि जेथे अज्ञानरूपी अंधःकार असतो, तेथे ज्ञानरूपी प्रकाश पाडणारा असा जो कोणी, तो "गुरु" म्हणून संबोधित केला जातो. आता आपण आपल्या आत्तापर्यंत व्यतीत केलेल्या आयुष्याकडे पाहिले, तर असे आढळते, कि आपण जसजसे एक एक वर्ग (कक्षा) उत्तीर्ण होत, पुढे म्हणजेच पूर्ण माध्यमिक शाळेचे जेव्हढे वर्ग होते, तेव्हढे उत्तीर्ण होऊन कॉलेजला गेलो, तेथेही आपल्याला वेगवेगळे विषयाला नवनवीन प्रोफेसर भेटले, त्यांनी देखील आपल्याला जे काही कमीअधिक शिकवले. आपल्या अज्ञानाला दूर करून त्यांत ज्ञानरूपी प्रकाशाला प्रज्वलित व प्रस्थापित केले. ह्याचाच अर्थ हा निघतो, कि हे शाळेपासून कॉलेजपर्यंत किंवा क्लासमध्ये वगैरे वगैरे, आपल्याला शिकवणारे हे सर्व आपले "गुरु" आहेत. ह्याचाच अर्थ असाही निघतो, कि पैसे मोजले तर "गुरु" वाट्टेल तेव्हढे मिळू शकतात. पण कितीही पैसे वा श्रम खर्च केले तरीही सत्गुरू नाही मिळू शकत. हे वास्तव आहे. त्याला पार नाही, म्हणजेच अन्य रस्ता नाही. असे का?
    पण आतापर्यंत लिहिलेले वाचले, तसेच आपणा सर्वांना साधारण जाणीव देखील आहे, परमेश्वराला तुमचा भाव व श्रद्धा हवी आहे, तुमचा गंध, हार, अक्षता, नारळ, प्रसाद, फुल, पैसे, दागिने ह्यांतले काही नको असते. ह्यायेथे "भगवत गीता" चा उल्लेख करावासा वाटतो, जर आपणांपैकी कोणी "भगवत गीता" वाचली असेल, तर त्यांना माहित असणार, कि ह्यामध्ये कधीही, कुठेही, कुठल्याही श्लोकांत, कर्मकांड म्हणजे, मागे लिहिल्याप्रमाणे, पूजेच्या विविध वस्तू घ्या, अमुक किंवा तमुक तऱ्हेने पूजापाठ करा वगैरे, असे काहीच न सांगता, संपूर्ण कर्मयोग कसा उत्तम ठरतो, परमेश्वरापर्यंत कसे पोहोचता येते, हेच श्रीकृष्णाने, उधृत (सविस्तर उलगडा) करून, समजावून सांगितले. तेच आपल्याला अधिक व्यवस्थित समजून घ्यायचे आहे, म्हणूनच आता ह्या इथे प्रकर्षाने आपण नीट लक्षांत घ्यावे, कि सत्गुरू मिळणे, तसेच त्या सत्गुरुंची सेवा करायला लाभणे, हे तुमच्या किंवा माझ्या फक्त मनांवर वा इच्छेवर अवलंबून नाही, तर ज्याच्या त्याच्या, कर्मावर व मनाची ओढ, निव्वळ ह्यावरच अवलंबून असते. आणखी एक महत्वाची बाब येथे सांगणे फार गरजेचे वाटते, कि "ज्याला, त्याच्या कर्मफ़लावर व मनाच्या ओढीवर सत्गुरू लाभतो, तोच त्याला मिळालेल्या ज्ञानाचे "'समाजोपयोगी कर्मांत उपयोग करून' त्याचे सोने करून दाखवतो."
    से आता आपण वाचले, परमेश्वराला ज्याप्रमाणे आपला भाव व आपली श्रद्धा हवी असते, त्याचप्रमाणे सत्गुरुला देखील ह्याच दोन मुख्य भावना त्याच्या शिष्यांमध्ये, अभिप्रेत असतांत. चला तर प्रथम आपण म्हणजे काय? ह्याअगोदर सत्गुरू ह्या शब्दाची व्याख्या काय आहे? हे पाहणे फारच गरजेचे ठरते.
    "स" ह्या शब्दाचा अर्थ आहे, "सकारात्मक." "स" ला जेव्हा "त किंवा द" जुळतो, त्यावेळेस "सत" किंवा "सद" चा अर्थ होतो, "सत्य" (जीवनाचे खरे मुल्य, जे मुलभुत सत्य, असे आहे ते मुल्यवान "परमसत्य"). "गु" म्हणजे "अंधःकार," "गुह्य" म्हणजे लक्षांत न येणारे, आणि "रु" म्हणजे प्रकाश. आता ह्या सर्व शब्दांचा मिळून असा अर्थ होतो, कि जेथे काहीच लक्षांत न येणाऱ्या अशा "अंधःकाररुपी अज्ञान" चे वास्तव्य असते, तेथे "परमसत्याचा, शाश्वत स्वरुपाचा, शाश्वत प्रकाश" जो पाडू शकतो, तोच "सद्गुरु" होऊ शकतो व होतो. असा सद्गुरु आपल्या शिष्याला जेव्हा ईश्वरीय परम तत्वाची ओळख करून देतो, त्या वेळेला, ज्या प्रमाणे एखादी विद्युत उपकरणाची वायर इलेक्ट्रिकला जोडलेले असता, आपण बटन दाबले कि उपकरण चालू व्हायला फक्त निमिषमात्र सेकन्दचा वेळ लागतो, तेव्हढाच वेळ, ह्या जीवाची आणि शिवाची, म्हणजेच आत्म्याची व परमात्म्याची भेट व्हायला लागतो व पुरतो. ह्यावरून आपण सर्व असे लक्षांत घ्या, कि एकदा सत्गुरू मिळाला, त्याची कृपादृष्टी झाली, कि त्या शिष्याचे जीवनाचे मंगलमय व्हायला वेळ लागत नाही. त्याचबरोबर आपण हेही लक्षांत घ्या, कि ह्या गोष्टीकरता कुठलाही सत्गुरू, कुणाही शिष्याकडून, गुरुदक्षिणा म्हणून कधीही, कुठलीहि रक्कम किंवा काही ऐवज तर सोडाच, पण एकही पैसा घेतल्याचे, कुठलीहि पूजा, कुठलेही कर्मकांड करायला सांगण्याचे तर सोडाच, पण साधी अगरबत्ती देखील लावण्यांस किंवा आणण्यांस सांगितले, असे आजपर्यंत ऐकिवांत नाही. तरीपण तसेच जर कोणी मागत असेल, व करायला सांगत असेल, तर आपण निश्चितच समजून चला, कि काहीतरी खोटेपणा ह्यांत निश्चित आहे. कारण ईश्वरालाच ते मुळांतच मंजूर नाही.
    तापर्यंत प्रिय वाचकहो, आपण जे काही वाचलेत, मनन केलेत, त्यावरून आपण सर्वांना साहजिकच कळले असेलच, कि ईश्वराला, सद्गुरूला आपल्याकडून काय अभिप्रेत असणार व आहे. तसेच सद्गुरूची व्याख्याहि कळली, त्यामुळे आपणाला सद्गुरु ओळखणे व समजणे अवघड होणार नाही. कारण आज स्वतःला सत्गुरू म्हणवणारे अशा व्यक्ती गल्लोगल्ली स्वतःची जाहिरात करतांना दिसतांत व सापडतांत. ह्यापुढे आपण कोणीही, कोणाचीही तपासणी त्याप्रमाणे करू शकता. लक्षांत घ्या, ईश्वराचे निजस्वरूप "परम तत्व" दाखवणे व समजावणे, जेव्हढे सोपे वाटते, तेव्हढेच समजणे देखील कठीण आहे. जे फक्त आणि फक्त सत्गुरू आणि त्याचे आशीर्वाद लाभलेले परम शिष्यच करू शकतांत. ह्याइथे अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ईश्वराचे, परमतत्वाचे ज्ञान लाभलेले शिष्य, हे एकमेकांना सत्गुरुंचे रूप मानून तेव्हढाच आदर, सत्कार व सन्मान देतांत, कारण, "परम तत्वाचे" ज्ञान लाभल्यावर, तो शिष्यदेखील पावन होतो. प्रिय वाचकहो, आपण जे आतापर्यंत वाचले व पढे वाचाल, ते न विसरता, त्याचे चिंतन व मनन करत रहा, तुमची दृढ आस्था, तुमचा भाव, तुमची श्रद्धा, ह्या ईश्वराला जरूर इतकी मजबूर करेल, कि तुमच्याकरता सत्गुरुंची सोय, तो परमेश्वर स्वतःच करेल, हा विश्वास मनी बाळगा व जागा ठेवा.
    दाचित आता इथपर्यंत आपण आल्यानंतर, आपणा सर्वांना असे वाटू लागणे सहाजिकच आहे, कारणही तसेच आहे, दासला कळते, तुमच्या मनाचा गुंता कुठेतरी होतोय किंवा झालाय, कि जेव्हा आपण ईश्वराला ओळखत नाही, त्याचे निजस्वरूप परमतत्व आपल्याला माहित नाही, तर आपली प्रार्थना, आपला भाव, आपली श्रद्धा त्या परमेश्वरापर्यंत कशी पोहोचेल? काळजी करायचे मुळी कारणच चुकीचे आहे. कसे आणि काय? चला तर आपण नीट समजून घेऊया. प्रथम हे लक्षांत घ्या, कि "जरी आपण म्हणजे आपले मन," त्या ईश्वराप्रती अनभिज्ञ असले, तरीही तो ईश्वर, आपणा सर्वांना तर सोडाच, पण प्रत्येक किड्या व मुंगीला, ओळखतो. ह्याचाच अर्थ ईश्वर आपल्याला (आपल्याकरता) अनभिज्ञ असला तरीही, ईश्वराला (ईश्वराकरता) आपण कधीही केव्हाही अनभिज्ञ नाही आहोत. ह्याचाच अर्थ, आपली एकेक कृती, एकेक भावना, असे सर्वकाही त्याच्यापासून लपून राहू शकत नाही, तर आपली आस्था, आपली भावना, आपली प्रार्थना, त्याच्यापासून कशी लपून राहील? लक्षांत घ्या, ज्याप्रमाणे मोठी मेणबत्ती, त्याच्यापासून पेटलेल्या अनेक लहान मेणबत्त्या, त्यांचा पडलेला एकत्र प्रकाश, हे उदाहरण, वास्तवांत कसे आहे? त्याचा विचार करून, आपण त्यातलाच भाग कसे आहोत, हे विचारपूर्वक आपल्या मनांत रुजवलेत, तर निश्चित सांगतो, कि तुमची प्रार्थना सफल न होण्याचे काहीही कारणच उरणार नाही, नाहीच रहाणार. म्हणूनच आपण, आपल्याठायी ईश्वराप्रती ज्या भावना असायला पाहिजेत, त्या ठेवून आपली निष्ठा, कायम जागृत ठेऊन, आपल्या प्रार्थनायोगे, ईश्वराला नेहेमी आपण समर्पित राहूया, जेणेकरून आपले व आपल्या आत्म्याचे कल्याण होईल.
    ता हीच भावना, ईश्वराची प्रार्थना म्हणतांना, आपल्या मनांत अधिक प्रेरक व परिणामकारक रित्या कशी काय रुजू शकेल? आणि रुजवू शकतो? हे आपण पाहुया. कारण सर्वांना माहित आहे, कि माणसाचे मन अतिशय चंचल आहे, त्याला एकाजागी थांबवणे जिकीरीचे काम असते, व त्यामुळे आपली प्रार्थना कदाचित सफल न होण्यास कारणीभूत ठरू शकते. काळजी करू नका, पुराणांत असे मार्ग, ज्याला साधारण पुजेपेक्षा, अत्त्युच्च मानले व वर्णले, असे मार्ग अगोदरपासूनच विस्तार करून ठेवले आहेत, जे त्या वेळेला त्या लोकांना, व आता आपल्याला देखील, फारच सोपे आणि सहज जमणारे, तसेच अधिक ईश्वरासमिप घेऊन जाणारे, ठरतांत व आहेत, हे अनुभवांती सिद्धदेखील झाले आहे.
    क्षमा करा, आपण पुढे हि प्रार्थना म्हणण्याची, पूजा कशी करण्याची हि क्रिया, वाचून म्हणाल, कि हे अगोदर का नाही सांगितले? परंतु लक्षांत घ्या, कि कोणत्याही गोष्टीच्या माहित पडण्या अगोदर, आपली संपूर्ण मानसिक बैठक तयार व्हावी लागते, अन्यथा त्याचा जो परिणाम व्हायला पाहिजे असतो, तो न होता, काही वेगळेच निष्पन्न होऊ शकते, असे होण्याची शक्यता फारच असते, व होते देखील. म्हणूनच आता हीच योग्य वेळ आहे, आपणाला हि पूजाविधी सांगण्याची व समजावण्याची, ज्यामुळे म्हणजेच ह्यायोगे, आपण एकट्याने, आपल्या शरीराने, शांत मनाने, शांत चित्त व वृत्तीने ईश्वरासमिप, कुणाचाही आधार न घेता, आपण स्वतःच स्वतःला, स्वतःच्या मनःशक्तीने, निश्चितच घेवून जाऊ शकता.


Pg 22

मानसपूजा
    हि पूजा सुरु करण्या अगोदर नेहेमीप्रमाणे आपली आन्हिक (प्रात:र्विधी, स्नान) उरकून, स्वच्छ कपडे घालून, जेथे साधारण किंवा भरपूर सुर्यप्रकाश अशा एका स्वच्छ खोलीमध्ये किंवा स्वच्छ जागी जमिनीवर, पूर्व दिशा, जमत नसेल तर पश्चिम दिशा, करून, आपले आसन ठेवून बसा किंवा उभे रहा. (लक्षांत ठेवा, ह्या "मानास्पुजेला" गंध, फुल, हार, नारळ, अगरबत्ती किंवा तत्सम वस्तूंची काहिएक गरज नसते.) तसेच हि मानसपूजा, आपण कधीही, कितीही वेळा करू शकतो, फक्त हाथ, पाय व चेहेरा धुवून, स्वछ कपडे, घातलेले असावेत, जेणेकरून आपले मन व चित्त शांत व प्रसन्न राहून, ध्यान लागण्यास योग्य वाटावे.
१. डोळे मिटून, त्याच अवस्थेत, प्रथम आपल्या मनाला व चित्तवृत्तीला शांत करून एकाग्र करा. नंतर त्या मोठ्या मेणबत्ती आणि अनेक छोट्या मेणबत्तीचे उदाहरणाची आठवण करून, दुसऱ्या माशाच्या उदाहरणाची आठवण करून, आपल्या मनी जागृत राहू द्या. त्यानंतर आपण ज्या देवाची (शक्तीची) उपासना (प्रार्थना) नेहेमी करता, त्या देवाची सुंदर व सस्मित अशी पावन मूर्ती, आपल्या कल्पनाशक्तीने, आपल्या मन:पटलावर येवू द्या, दृश्यमान होऊन द्या.
२. ज्यावेळेस अशी सुहास्यवदन पावन मूर्ती, आपण आपल्या मनी म्हणजेच आपल्या ध्यानी आणण्यास यशस्वी झाल्यानंतर, कल्पना करा, चारही बाजूला म्हणजेच सभोवताली, सुंदर सुंदर, ताजी फुल उमललेली अशी लहान लहान झाड, लता, वेली अशा वनराईने नटलेली आहे, व त्याचा सुगंध आसमंतात दरवळत आहे. आता त्याच ध्यानमग्न अवस्थेत, आपल्या अगदी बाजूलाच असलेल्या काही झाडावरून तर काही वेलींवरून सुंदर ताजी फुल तोडून, आपल्या समोर असलेल्या त्या देवतेच्या मूर्तीच्या चरणी वहा. त्यानंतर जसे मासा ज्याप्रमाणे पाण्यांत राहून त्याच्या सभोवताली त्याचे जिवनतत्व भरलेले आहे, तसेच संपूर्ण वातावरणांत, आपल्या वर खाली, सभोवताली अशीच परमशक्ती भरलेली असून, आपणहि त्या अथांग महासागरांत त्याचाच एक हिस्सा आहोत, ह्याची पुरेपूर जाणीव ठेवून, त्या डोळे मिटलेल्या (ध्यानमग्न) अवस्थेत, कल्पना करा, कि त्या देवतेच्या सुहास्य वदनाकडे पहात आहांत, व त्या देवतेची प्रार्थना किंवा आरती जे तुम्हाला योग्य वाटते ते मनातल्या मनांत म्हणा. (लक्षांत ठेवा, आपली हि प्रार्थना कमीतकमी १५ मिनिटे तरी झाली पाहिजे, कारण त्या देवतेशी आपले मन एकरूप व्हायला, कालावधी तेव्हढा मध्यन्तरी असावा लागतो.) जर तुम्हाला वाटले तर हीच प्रार्थना जास्तही वेळ करू शकता..प्रार्थना म्हणून संपल्यावर, त्याच ध्यानमग्न अवस्थेत, त्या देवतेला, तो "परमात्मा," त्याच्या निजस्वरूप "परम तत्वाची" ओळख करून देण्याकरता विनंती कमीत कमी तीनवेळा करा.
३. त्यानंतर त्या परमात्माला जरी तुम्ही ओळखत नाही तरी त्याच्याकडे "हे परमात्मा माझे जे काही आतापर्यंत चुकले असेल, पाप घडले असेल, ते मला अज्ञान बालक समजून माफ कर, व मला, माझ्या कल्याणार्थ सत्गुरू मिळवून दे," अशी विनंती नमन करत, तीनवेळा केल्यावर, परत नमन करून तुम्ही ध्यानावस्था सोडू शकता. अशी तुमची चांगल्या कामाकरता केलेली विनंती व मागणी, त्या परमात्माच्या चरणी ताबडतोब मंजूर होते. परंतु लक्षांत ठेवा, तुमची मागणी किती दृढ निश्चयाने केलेली आहे, हे पहाण्याकरता "ईश्वर" जरूर तुमची प्रार्थना व विनंती कितीवेळा एकमग्न होऊन, ध्यानपूर्वक करता, हे जरूर पाहील. (टीप: लक्षांत ठेवा "ईश्वर" तुम्ही अगोदर जी काही पाप केली, ती अजाणतेपणाने केली, असे समजून तुमची पाप क्षमा करेल, पण त्यानंतरही, जाणूनबुजून केलेल्या पापांना तो "ईश्वर" तुम्हाला अधिक दोषी मानेल, हे सर्वथा लक्षांत असू द्यावे.)
    पण सर्व वाचकहो, आपण सुज्ञ आहांत, आपणाला माहित आहे, जोपर्यंत बालक रडत नाही, तोपर्यंत माता, बाळाला दुध पाजत नाही, ह्याचाच अर्थ, जोपर्यंत रडत नाही, तोपर्यंत ईश्वराची, म्हणजेच ईश्वराकरता, आपल्याला असलेली भूक मिटणार नाही. ह्याइथे आपण लहान बालक असू नाहीतर कितीही वयाने मोठे, परमेश्वरासमोर आपण नेहेमीच बालकच आहोत, व रहाणार. तसेच ज्याप्रमाणे एक माता, आपल्या बालकाला जास्त वेळ रडू देत नाही, त्याप्रमाणेच परमेश्वरही आपल्या बालकाला, त्याच्या आत्म्याच्या कल्याणाकरता जास्त वेळ रडू देणार नाही, ह्याची खात्री बाळगा.

महत्वाच्या सुचना:
१. आपण हि मानसपूजा, सुरु करण्याच्या अगोदर, काही म्हणजे सात दिवस अगोदर पासून, वस्तुनिष्ठपणा व स्वार्थीवृत्ती सोडण्यासाठी, आपल्या मनावर ताबा मिळवावा लागेल. तसेच मानसपूजा सुरु केल्यावर त्या वृत्तीला कायमची तिलांजली द्यावी लागेल.
२. मानसपूजा चालू असतांना किंवा झाल्यावर तत्सम स्वार्थी बुद्धीने काहीही कोणत्याही, ईश्वरप्राप्ती शिवाय, आपल्या काम-धंदा तोही नैतिक मार्गाने, आरोग्य, यांच्या शिवाय स्वतः करता अन्य प्रकारच्या कोणत्याही सफलतेची मागणी करू नका. परमेश्वराला ते मंजूर नाही. कारण ईश्वराला कुणाला कधी काय द्यायचे, कसे ठेवायचे, हे सर्व माहित असते व ते तो ठरवतो. मात्र तुम्ही तुमची प्रार्थना झाल्यावर, दुसऱ्या कुणाच्याही करता, जसे त्याच्या आजारपणातून बरे होण्याकरता, तसेच त्याच्या दीर्घायू बद्दल मागणी करू शकता. किंवा त्याने केलेल्या फक्त चांगल्या कार्याच्या सफ़लतेकरता, आपले सहमत नोंदवू शकता.
(लक्षांत ठेवा, जो भक्त, दुसऱ्यांकरता, समाजाकरता, मानवतेकरता, त्याच्या कल्याणार्थ मागणी करतो, तो भक्त, ईश्वराला सदैव अत्यंत प्रिय असतो.)

काही अशाच अनुषंगाने, अजून काही उलगडा करावासा वाटतो, कदाचित काहीवेंळी, आपणांस काही आर्थिक किंवा सांपत्तिक अडचणी आल्यांस, आपण कोणतीही आर्थिक मागणी न करता, फक्त होणारी अडचण सोडवून द्यावी, अशी विनंती, ईश्वरापाशी जरूर करू शकता. तसे बघायला गेले तर ईश्वर, आपल्या भक्तावर, आलेले संकट, जरूर निवारण करतोच करतो, फक्त तो योग्य संधीची वेळ ठरवतो. व त्याला वेळ लागतो, म्हणूनच आपले धैर्य सुटून देता कामा नये. त्याकरता ईश्वर आपणांस सहन करण्याची ताकद (बळ) देवो व सुबुद्धी देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    र आपणांस जी मानसपूजाविधी, सांगितली, समजावली, कशी वाटली? आहे कि नाही सोप्पी? ह्या प्रार्थनेकरता, कुठेही जावे यावे लागत नाही, ताजा गंध उगाळणे, ताजी सुवासिक फुले व हार बाजारांत शोधणे, अगरबत्ती व काडेपेटी संभाळणे, नारळ चांगला कि वाईट, लहान किंवा मोठा, त्यांतच महत्वाचे म्हणजे काही वस्तूंचा बाजारांत अवेळी असणारा अभाव तसेंच त्याच्या किंमती, बरे पैसे मोजले तरी वस्तू चांगल्याच मिळतील ह्याची शाश्वती तर बिलकुल नाही. अशा परिस्थितीत देखील हीच पूजा श्रेष्ठ ठरते, तसेच हि मानसपूजा मनोध्यानांतून केल्यामुळे, हि पूजा, साधारण पुजेपेक्षा श्रेष्ठदेखील आहे आणि पुराणांत तसे त्याचे वर्णनदेखील आहे, आता आपणच सांगा? का हि अशी, साधी, सोपी व सरळ, जी चित्पावन पूजा आहे, ती करू नये? तसेच ह्या पूजेचे आणखीही काय फायदे आहेत? त्याचाही उलगडा करून, आपणांस पुढे सांगतो, जे वाचल्यावर आपण सर्व वाचकहो, निश्चितच अशीच पूजा करण्यांस प्रवृत्त व्हाल, व त्यांतच आपला क्षणिक नाही, तर कायम फायदाच आहे हे कळेल, या ध्यान करून केलेल्या मानस पूजेची महिमा अपरंपार आहे, ह्याचे पुरातन काळापासून पुरावे देखील आहेत. फक्त तम्ही "शुभस्य शीघ्रम" सुरवात करा, तुम्हाला देखील त्याची खात्री पटल्या शिवाय रहाणार नाही, याची दासला खात्री आहे.
    पण कोणत्याही जाती धर्माचे असू, किंवा काय पूजाविधीचे पालन कर्माने करत असू, त्याला महत्व प्राप्त होऊ शकत नाही, कारण त्याला महत्व तेव्हाच प्राप्त होते, जेव्हा ते मनःपूर्वक आपण करतो. सर्वसाधारणपणे बघायले गेले, तर कोणी रोज देवाच्या प्रतिमेला पुसतो, गंध, फुल व हार घालतो, १० ते १५ मिनिटे श्रद्धेने प्रार्थना म्हणतो, नमन करून, आपल्या दैनिक कामांस सुरवांत करतो, आणि केव्हातरी महिन्यातून एकदा किंवा कोणी फक्त सणासुदिच्याच दिवशी, घरांतल्या सर्वांबरोबर, मंदिरांत नमस्कार, करायला जातो. तर कोणी दररोज, त्याच्या देवाच्या फोटोपुढे (मूर्तीपुढे), श्रद्धेने दिवा लावून प्रार्थना म्हणतो, व आठवड्याला एकदा चर्चमध्ये जाउन, श्रद्धेने मेणबत्ती लावतो व सामुहिक प्रार्थना म्हणतो. जो तो आपल्या वाडवडील पासून जसे माहित पडले, लहानपणापासून करत आले, तसेच पुढेही करत आहेत. ठीक आहे, योग्यच आहे. हि माणसे एव्हढे तरी करतांत, काही जण तर हेही करत नाहीत. काहीही नसण्यापेक्षा, काहीतरी असणे, हे नेहेमीच चांगलेच ठरते. कारण पुढच्या येणाऱ्या यशाची तीच पहिली पायरी ठरते, व दासला खात्री आहे, कि हीच श्रद्धावान लोक, हि मानस पूजा जरूर करून बघतील, व ध्यानयोगांत रममाण होऊन, एकदम ईश्वरानिकट पोहोचतील, तसेच हीच ईश्वर साधना (मानस पूजा) त्यांना सत्गुरू मिळवून देण्यास कारणीभूत होईल, दास देखील अशीच पायरी चढत गेला, त्यानंतरच दासला सत्गुरुची प्राप्ती झाली. तशीच आपणा सर्वांना सत्गुरू मिळावा अशी ईश्वर चरणी सदैव प्रार्थना करतो.

पुढच्या प्रसिद्ध होणाऱ्या पानांत, हि मानसपूजा (ध्यानयोग) कशी व का श्रेष्ठ ठरते, ह्याचे थोडे अधिक विवेचन लिहिणार आहे.

आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

Tuesday, October 6, 2015


पान नंबर १९ व २०
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 19
सत्गुरू आणि परमतत्वाचे केलेले विश्लेषण
    ह्यापुढे आपल्याला अजून जास्त चांगल्या पद्धतीने "परम तत्व" लक्षांत येण्याकरता, आणखी एक उदाहरण येथे देत आहे, ज्याचा उल्लेख "श्रीगुरुदेव दत्त" स्तुती श्लोकांत, अनादि काळांत, खालीलप्रमाणे फार सुंदररीत्या केला गेला आहे, व समजून घ्यावयास निर्विवाद अतिउत्तमच आहे. तसे पाहिले तर, ह्या अगोदर ह्यांतल्या पहिल्या दोन ओळी व त्याचा अर्थ, दासने समजावला आहे, तरीही हरकत नाही, आपण परत येथे "सर्वव्यापक" अर्थ समजून घेऊ म्हणजे आपल्या मनी कोणताही किंतु किंवा परंतु असे शब्द (शंका) येणार नाहीत.

श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुः साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः ||
ब्रह्मानंदं परमसुखदं, केवलं ज्ञानमूर्तिम |
द्वंद्वातीतं, गगनसदृशं, तत्वमत्स्यादिलक्ष्यं ||
एकं नित्यं, विमलमचलं, सर्वधीसाक्षिभूतं |
भावातीतं, त्रिगुणरहितं सत्गुरू त्वं नमामि ||

    ह्या संपूर्ण श्लोकांत पहिला श्लोक व त्याची टीका तसेच विशद केलेला अर्थ देखील, आपण पान नं. १६ मध्ये सुरवातीलाच वाचला. आता पुढील दोन श्लोकांची वेगवेगळी टीका व त्यांचा एकत्र विशद अर्थ, आपण पाहुया.

ब्रह्मानंदं परमसुखदं, केवलं ज्ञानमूर्तिम |
द्वंद्वातीतं, गगनसदृशं, तत्वमत्स्यादिलक्ष्यं ||
टीका:
ब्रह्मानंद देणारा, परमसुखदायक असा वाटणारा, अशी हि पावन गुरुज्ञानमूर्ती पाहून, मनी चलबिचल थांबविणारे, आकाशासारखे सर्वव्यापक प्रतीत होणारे, पाण्यांत राहूनही मासे लक्ष साधू शकत नाहीत, असे तत्व उलगडून दाखविणारे असे माझे गुरु.


एकं नित्यं, विमलमचलं, सर्वधीसाक्षिभूतं |
भावातीतं, त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ||
टीका:
एकसारखी, निर्लेप असून अढळ, सर्वभूतांना साक्षी असून, भाव नसणारे, तिन्ही गुण नसणारे, अशा सत्गुरुला माझा प्रणाम असो.


दोन्ही श्लोकांचा एकत्र विशद:
ज्यांना पाहून ब्रह्मानंदाचा व परमसुखाचा लाभ निश्चित होतो, असे माझे पावन श्रद्धास्थान, जे ज्ञानाने परिपूर्ण आहेत, जलाशयांत राहून माशाला ज्याप्रमाणे, त्याला त्याचे जीवनाचे तत्व कळत नाही, त्याप्रमाणे सर्वदूर पसरलेले, आभाळासमान असणारे, असे परमेश्वरीय तत्व, असे ज्ञान कि जे मनांत द्वंद्व (हलकल्लोळ) उडवते, न बदलणारे, कुठलेही आच्छादन न ठेवता, निर्लेप असणारे, अढळ राहून, सर्व भूत, वर्तमान व भविष्य काळाला साक्षी असणारे, सर्व भावांच्या पलीकडे असलेले, सत, रज आणि तम ह्या तीनही गुणांवर स्वामित्व राखून, हे गुण न बाळगणारे, अशा ईश्वरीय तत्वाचे अनुसंधान करून, त्याची कृपा करवून देणारे, त्याचे ज्ञान विवेचन करून निरुपण करणारे व समजावणारे, अशा माझ्या सत्गुरुला माझे कायम नमन (प्रणाम) आहे.


    मुख्यत्वे आपण आता माशाचे उदाहरण, जे कलियुगाच्या प्रारंभिक कालांतच दिले गेले, ते उत्तम तऱ्हेने विशद केलेलेही पाहिले. माशाला पाण्यांत राहूनदेखील त्याला जसे त्याच्या जीवनाचे तत्व कळत नाही, पण जेव्हा कोणीतरी त्या माशाला जर पाण्याबाहेर काढले, तर मात्र लगेच निमिषमात्र वेळांत, त्या माशाला, त्याच्या जीवनतत्वापासून बाहेर (लांब) आल्याची जाणीव होते, व तो मासा तडफडू लागतो, हवा असून श्वास घेऊ शकत नाही, व थोडे अधिक वेळ पाण्याबाहेर राहिला तर त्याचा मृत्यू होतो. ह्याचाच अर्थ त्या माशाला पाण्याबाहेर आल्यानंतर, त्याच्याकरता अनन्य व असाधारण असे, त्या "पाणी" ह्या तत्वाचे महत्व कळले, परंतु नंतर कळून त्याचा काय उपयोग? नाही का?
    काय तुम्हाला असे नाही वाटत? जेव्हा आपल्याला गती प्राप्त होण्याची वेळ येईल, ईश्वराकडे परत जाण्याची वेळ येईल, त्यावेळेस नेमकी अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होईल? आपली देखील अशीच तडफड होईल, कारण आपल्याला देखील आपले खरे तत्व म्हणजे जे ईश्वरीय परमतत्व नेमके काय आहे? कुठे आहे? त्याची व आपली काय सांगड आहे? माहित नसेल, तर काय होईल? निश्चितच आपणही भरकटणार, ह्यांत काहीच शंका नाही. ज्याअर्थी असे होते, त्याअर्थी असेही होते, आपण आपल्या "निजस्वरुपांत," म्हणजेच "ईश्वरीय परमतत्वांत" सामील होणार नाही, म्हणजेच आपला आत्मा हा "अशांत" रहाणार. म्हणजेच ह्याचा अर्थ असाही होईल, कि एव्हढा "मौलिक मानव देह" परमेश्वराने आपल्याला देऊन देखील व आपल्याला लाभून देखील, आपण त्याची, त्या परमतत्वाची माहिती करून घेतली नाही, त्याची भक्ती केली नाही, म्हणजेच ह्या पूर्ण आयुष्याची मात्र निव्वळ मातीच केली. आता ह्याशिवाय दुसरा काही अर्थ निघतो का? आपणच सांगावे.


Pg 20

    ह्याकरतांच परमेश्वर आपल्याला वारंवार आगाह (जाणीव) देतो, कि हे मानवा, तुला मी, तुझ्या आत्म्याचे सार्थक करून घेण्याकरता तुला सर्वोत्तम असा मानव देह दिला, सर्वोत्तम अशी बुद्धी दिली, तुझ्याकरता वेद, पुराण, बायबल, कुराण अशा धार्मिक तसेच मानवता शिकवणारे ग्रंथ लिहिले, तुझ्याकरता ह्या सर्व सृष्टीची रचना केली, संपूर्ण निसर्ग तुझ्या हवाली केला, तुला जे काही पाहिजे ते घेण्यासाठी तुला हात व पाय दिले, विचार करण्यांस बुद्धी दिली, काय खावे, काय प्यावे, काय नेसावे हे ठरवायचे स्वातंत्र्य दिले, तुला जी माझे निव्वळ प्रतिस्वरूप, अशी दया, करुणा, ममत्व ह्या अशा भावनांनी युक्त आई दिली, तुला तुझ्या पालन पोषणार्थ काळजी घेतील असे वडील दिले. जेणेकरून तू खुश रहावास, व तुझ्या भक्तीमार्गांत तुला काहीही अडचण येऊ नये ह्याची व्यवस्था केली. असेही नाही कि, सदा सर्व काळ माझी भक्तीच कर, म्हणून सांगितले, तर भगवत गीता मध्ये लिहून ठेवले, कि तू तुझे कर्तव्य व कर्म करत करतच माझी भक्ती कर, तसेच असेही उधृत केले कि कर्मयोग हा अत्युच्च असा भक्तीयोग (भक्तिमार्ग) मी मानतो, व अशीच केलेली भक्ती मला पोचते व पावते.
    तुझ्या कल्याणार्थ सत्गुरू व संत निर्माण केले, व त्यांनी मानवकल्याणार्थ अनेकप्रकारे, अनेक भाषांमध्ये भक्तीसाहित्याची निर्मिती केली, तसेच उपदेशही केले. परंतु हे मानवा, ज्याप्रमाणे लहान बालक, त्याला दिलेल्या एखाद्या किंवा अनेक आकर्षक खेळण्यांमध्ये रमते, त्याला खाण्यापिण्याची देखील शुद्ध रहांत नाही, त्याप्रमाणे तू मात्र तुझ्यासाठी, तुझ्या पालन व उपयोगासाठी मी निर्माण केलेल्या अनेक क्षणभंगुर तसेच नाशिवंत गोष्टींच्या लालसा व आकर्षणात अडकून त्याचा संचय करण्याची आकांक्षा बाळगून, राक्षसी वृत्ती जोपासलीस, व मानवतेला झिडकारलेस, तर त्यांत माझी काय चूक आहे? हि चूक तुझी स्वतःचीच असणार आहे. तुला मी रिकाम्या हाताने पृथ्वीवर पाठवले, तसेच परतीला तू रिकाम्या हातानेच परत यायचे आहेस, हे कायम माहीत असतांना सुद्धा त्याच आकर्षणांत अडकून पडलास. परंतु नेहेमी प्रत्येक मानवाला जन्मांस घालतांना, असाच मानव जन्मांचा अर्थ गृहीत धरला, कि प्रत्येक मानव, पृथ्विलोकी जन्म पावल्यावर, आपल्या आत्म्याचे व ईश्वराचे निजस्वरूप जाणून, ईश्वराची प्रार्थना व त्याची भक्ती करून, आपला उद्धार करून, ज्ञानी होऊन, परमेश्वराच्या "परमतत्व" असे निजरुपांत, सम्मिलित होईल, म्हणजेच मोक्ष पावू शकेल अशी मी रचना केली.
    री हे मानवा आतातरी वेळ न घालवता शक्य तेव्हढ्या लवकर, ह्या निव्वळ मोहमयी मायेतून सूट, आपली वृत्ती समाधानी ठेवून, आपले ध्यान सन्मार्ग व भक्तीकडे लाव. त्यातच तुझे, तुझ्या मातापित्याचे, तुझ्या कुटुंबाचे कायम कल्याण होणार आहे, ह्यावर विश्वास ठेव. व कायम विश्वास ठेवून रहा. तुमच्या चंचल मनाला, तुम्ही संतांच्या समवेत लावलेत तर तुम्हाला काहीही कधीही कधीच अडचण येणार नाही, व आलीच तर त्या अडचणी बाबत संतांना सांगा, व त्यांना त्याचे निवारण करायला सांगा, काळजी करू नका, ईश्वर ते निवारण करण्यास समर्थ आहे, कारण ईश्वर मातापित्यांचे पायी व संतांच्याच ठायींच सापडतो, अन्यत्र कुठेही ईश्वर सापडणे कायम अशक्यच असते.
    प्रिय वाचकहो, आतापर्यंत लिहिलेले वाचून, विनाकारण काळजी करू नका, घाबरू देखील नका, कारण आपण इथपर्यंत जे लिहिले आहे ते संपूर्ण वाचत आलांत, ह्याचाच अर्थ असा होतो, कि आपल्याला परमेश्वराचे ज्ञान (ओळख) करून, त्याची भक्ती करणे आवश्यक असल्याचे पूर्णपणाने कळले आहे. ह्या अगोदरच्या पानी व ह्या पानांवर लिहिलेले जर आपल्याला व्यवस्थित कळले असेल व आपल्या मानव जीवनाचे मर्म म्हणजे ईश्वराला प्राप्त करणे आहे. इथपर्यंत जर आपण मनांशी ठाम झाला असाल, तर निश्चितच समजू घ्या, कि तुमची, आपली स्वतःची परमेश्वराकरता भक्ती, जेव्हापासून तुम्ही मेणबत्तीचे उदाहरण वाचावयांस सुरवांत केलीत, तेव्हापासूनच सुरवांत झाली आहे. तसेच आणखी यापुढे जसजसे तुम्ही पुढे वाचत जाल, तसतसे तुम्हाला ईश्वरीय सानिध्य कसे प्राप्त करावे ते सोपे करत आहे. त्याकरता कुठलाही तुमच्या ध्यानी येईल असा, पण ईश्वरीय श्लोक किंवा मंत्र, जर काहीच सापडत किंवा समजत नसेल तर, प्रत्येक पानी हेडिंगला "दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा" || हा मंत्र, सकाळी स्नानानंतर व रात्री झोपायच्या अगोदर, १०८ वेळा म्हणत चला. आस्ते आस्ते, लवकरांत लवकर, आपणाला अनुभूतींची प्राप्ती होण्यांस सुरवांत होईल. येथे आपल्या मनांत येईल कि दासने कुठलाही पण ईश्वराचा श्लोक किंवा मंत्र, असे का लिहिले व म्हटले? कारण अत्यंत साधे आहे, ईश्वराला तुमची त्याच्याबद्दल असलेली आंतरिक ओढ, तुमची आस्था ताबडतोब कळते. त्याला तुम्ही कोणत्याही नावाने आवाज द्या, मग तुम्ही कुठल्याही भाषेत त्याला तुमचा आवाज द्या, तसेच तुम्ही, कुठल्याही धर्माचे, कुठल्याही संप्रदायाचे, किंवा काळे वा गोरे असा, ईश्वर तो विचार कधीच करत नाही, कि करणारही नाही, कारण सर्व सजीव, निर्जीव व निसर्ग, त्यानेच निर्मिलेले आहेत. तुमची कर्म, तुमची आस्था जर स्वच्छ असतील तर, तुमची हाक ईश्वर ऐकतोच ऐकतो. ईश्वराला तुमचे ध्यान, तुमची प्रेरणा, तुम्ही केलेली तुमच्या मातापित्याची सेवा, मानवतेची सेवा, व त्याला ओळखून, त्याचे नुसते नामस्मरण पाहिजे आहे. ध्यानांत ठेवा, ईश्वराला तुमचा हार नको, नारळ नको, गंध व अक्षता नको, तुमच्या मिष्टान्न (प्रसाद) नको, तर त्याला तुमच्या मनाच्या समर्पणाची व मानवतेकरता तसेच त्याने निर्मिलेल्या निसर्गाच्या जपणुकीची आवश्यकता आहे. म्हणजेच ज्याचा स्वामी स्वयं परमेश्वर आहे, त्याला तेच काय देऊ करता? त्याला तर तुमच्या, इतरांप्रती असलेली दया, करुणा, सेवाभाव व ईश्वराचे नामस्मरण एव्हढेच हवे आहे. आणि १००% खात्री बाळगा, जसजसे आपण ह्यावर चालू लागाल, तसतसे आपण एक वेगळीच व्यक्ती म्हणून समाजांत स्थान प्राप्त कराल व ईश्वराच्या चरणी, आपली सेवा रजू होण्यास सुरवात होईल.
    थपर्यंत आल्यानंतर, साहजिकच माझे निस्सीम वाचकहो, आपणा सर्वांना सत्गुरू म्हणजे काय? तो कसा असतो? त्याची लक्षणे काय? त्याला कसा ओळखावा? हे प्रश्न मनांत खळबळ माजवत असतील. कारण दासला अंदाज आहे कि कितीही समजावून परमेश्वराबद्दल सांगितले, तरी त्या परमेश्वराचे अस्तित्व तसेच ओळख देण्यांस शब्द कमीच पडतांत. विचार करा, चार वेद, सहा शास्त्र व अठरा पुराण त्याचबरोबर अनेक संतांनी, अनेकविध मार्गांनी शब्दांनी सांगण्याचा तसेच शब्दांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही, कारण त्यासाठी शब्दच अपुरे पडतांत, तर समजून घ्या दासाचे शब्द किती पुरे पडतील? तरीही साध्या शब्दांनी, सहज रीतीने व सोप्या उदाहरणाने समजावून घेऊन, आपण खूपच ईश्वराच्या जवळ आलो आहोत तसेच आपल्याला ईश्वरापर्यंत पोचण्याकरता सत्गुरुची आवश्यकता भासते. म्हणूनच सत्गुरुंचे महत्व अनन्य व असामान्य आहे, म्हणून त्याकरता सत्गुरुला कसे प्राप्त करावे, हेही आपण पुढच्या पानी लक्षांत घेऊया..

पुढे प्रसिद्ध होणाऱ्या पानांत, प्रिय वाचकहो, आपण सर्वांकरता, सत्गुरुची ओळख, त्याचे वर्तन, त्याचे वर्णन कसे असते, ह्याबद्दल आपणांस माहिती करून दिली जाइल.

आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

Wednesday, September 30, 2015


पान नंबर १७ व १८.
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 17

    ता तुम्ही विचाराल, आपण कसे आणि कशा रीतीने परमात्मा ईश्वरचे अंश आहोत? आणि असू शकतो? ह्याचे उत्तर मिळण्याकरता आपण एक साध्या उदाहरणाने सुरवात करू. जसे कोणत्याही एका दिवशी, एका संध्याकाळी, आपण साध्या वाटीपेक्षा रुंद (मोठे) असे काही वाडगे घेऊया, आता त्यांमध्ये साधारण प्रत्येक वाडग्याचे पाउण भाग स्वच्छ पाणी भरू, आता हे पाणी भरलेले असे अनेक वाडगे, आपल्या घराबाहेर, मोकळ्या जमिनीवर, मोकळ्या आकाशाखाली एक एक करत आजूबाजूला पसरून ठेऊन दिले असतां, आपल्याला काय दिसेल? आकाशांत जो एकच चंद्र दिसतो, त्याचे प्रतिबिंब आपल्याला प्रत्येक वाडग्यात एक, असे अनेक चंद्र, आपल्याला दिसू लागतांत. असेंच नेमके, ह्या आत्मा आणि परमात्मा संबंधामध्ये आहे. आता आपण विचार असा करुया, कि काय आपण घाणेरडे गढूळ पाणी, त्या वाडग्यांमध्ये भरले असते, तर आपल्याला, चंद्राचे असे स्वच्छ प्रतिबिंब बघायला मिळाले असते का? तर नाही, असेच उत्तर येईल, कारण काय? तर ते गढूळ पाणी आहे म्हणून. आता आपण विचार करा, काय आपले मन स्वच्छ, निर्मल आहे? जर आपले मन, जसे असायला पाहिजे, तेव्हढे स्वच्छ व निर्मळ नाही, म्हणून तुम्हाला परमेश्वर म्हणजेच परमतत्व आणि आपण, ह्यामधला नेमका काय धागा (परस्पर संबंध) जोडला आहे, तो लक्षांत येत नाही व येणार नाही. काही काळजी करायचे कारण नाही. सुरवातीला असे होणे, सहाजिक आहे. आपण पुढे वाचत चला, आपले मन आपोआपच शुद्ध व निर्मळ होत जाइल. ह्याची खात्री बाळगा.
    पल्याला आत्मा आणि परमात्मा ह्यांमधला परस्पर संबंध तसेच त्याचे साधर्म्य येथे समजून घ्यायचे आहे. आपण परमेश्वर हा "निरंकार" असून निराकार अशा "परम तत्व" स्वरूपांत राहून, आपल्या खाली, आपल्या वर, आपल्या आजूबाजूला, संपूर्ण आभाळात, म्हणजेच संपूर्ण ब्रह्माण्डात व्यापलेला राहून आपले कार्य करंत असतो, हे समजून घेतले, इथे परत लक्षांत घ्या कि "ईश्वर आपल्या पासून कधीही लांब नव्हता व नाही आहे, उलट आपणच कायम ईश्वरा सन्निध असतो. आपण जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीला ईश्वर पहात (साक्षी) असतो. तसेच चंद्राचे, अनेक वाडग्यांत प्रतिबिंबचे उदाहरण पाहून, आपण प्रथम, पृथ्विलोकी, अंतराळांत रहाणारे, सर्व सजीव, त्या परमात्म्याचे रूप आहोंत. हे समजून घेऊया. खरेतर, आपल्याला हे अगोदर माहित होते, फक्त एव्हढेच नाही तर आपण परमेश्वराला जवळून ओळखत देखील होतो. मग असे काय झाले? कि आपण त्या परमेश्वराला विसरून गेलो? खरे तर ह्याचे उत्तर अगोदरच दिलेले आहे, तरीही जरा वेगळ्या दृष्टीने आपण परत त्या गोष्टीकडे पाहुया. आपण ह्या पृथ्वीवर, आपल्या जन्माच्या अगोदरपासून, ते आपल्या जन्मानंतरही ओळखत होतो. मग आपण कसे त्याला विसरलो? ते प्रथम आपण जरा जवळून पाहूया, तसेच अनुभव देखील करूया. म्हणजेच आपल्या लक्षांत येऊ शकेल.
    पण ज्या वेळेस जन्म घेतला, त्यावेळेस आपण, आपल्या शरीराला परमेश्वराने जोडलेले दोन मानवी डोळे उघडले, त्या वेळेस, आपले मातापिता, नातेवाइक, खेळणी, ह्या पृथ्वीवर असलेल्या अनेकविध गोष्टी, ह्यांमुळे आपण आपल्या वयाच्या २ ते ४ वर्षापर्यंत दिवसेंदिवस आपली ईश्वर बरोबर असलेली ओळख घालवून, ह्यांच मायेत स्वतःला हरवून, ह्या सर्व नातेसंबंध, ह्या रंगबेरंगी सुंदर जगाचे मायावी आकर्षण, आपल्याला इतके वाटू लागले, कि हे सर्व खरे आहे, ह्यावर आपला पूर्ण विश्वासच बसतो. जसे आपण पाहिलेच असेल कि ह्या लिहिलेल्या मजकुराच्या डाव्याबाजुला व्हीगनेट रंगीत रंगबिरंगी वलय दिलेले आहे (वास्तविक ते फक्त एक वेबपेज लिहिण्याची एक स्टाइल टेक्निक आहे), आपल्यापैकी अनेक जणांना ते माहीतही असेल, कि ते खरे वलय तेथे अस्तित्वात नाही, पण तरीही त्या एकमेकांमध्ये मिसळणाऱ्या आकर्षक रंगांमुळे आपली नजर त्या रंगीत वलयाकडे, प्रथम खेचली जाते. आपल्याला माहित आहे, ते वलय पहाण्यासाठी आपण हे पान वाचत नाही, तर ज्ञान मिळवण्यासाठी वाचतो आहोत, तरीही हि रंगबिरंगी माया कशी आपल्याला मोहित करते? माफ करा, मानवाची नजर व आकर्षण काय असते व मानव आपला वेळ कसा बिघडवतो, त्याचेच हे फक्त साधेच व लहान उदाहरण आहे. आपण आता आणखी मोठे म्हणजे, साधारण ६ ते १२ वर्ष वयापर्यंत, हे सर्व माझे व मी त्याचा, अशीच आपली गती झाली. त्यापेक्षा आणखी थोडे मोठे म्हणजे वयाच्या १६ ते १८ वयापर्यंत आल्यानंतर, आपल्याला हेही कळू लागले, कि कुठल्याही वस्तू कधीच टिकत नाहीत, निसर्गांत नेहेमी बदल होतांत, काल जे नवीन होत, ते आज जुने वाटते. नातेसंबंध देखील दिल्याघेतल्याचेच असते. सर्व काही ह्या नाशिवंत मायाजंजाळ करतांच धडपडत असतांत. हे सर्वकाही आपल्याला कळत असतांना देखील, जे इतर करतांत, व त्यांतच धन्यता मानतांत, ते पाहून आपणही तेच सर्व करतो, व करत करत त्यांत गुरफटतच जातो. हे आपल्याला समजावणारा कोणीही नव्हता. आणखी एक महत्वाचे कि, माणूस वयाने कितीही मोठा (प्रौढ) झाला, तरीही त्याचे मन नेहेमी बालसदृष्य गोष्टींमध्ये पटकन रमते. आता, ह्या सर्व गोष्टींत, महत्वाची गोष्ट, म्हणजे ह्या आपल्या अवतिभवती जे कोणी आपल्याला ओळखतांत, ते आपल्या शरीराला (चेहऱ्याला) ओळखतांत, आपल्या आत्म्याला नाही. आपले शरीर गोरे, चेहेरा सुंदर, असे असले, कि सर्व आपल्याला, त्यांच्या जवळ येऊ देतांत, पण आपले शरीर जर काळे, चेहेरा विद्रूप असेल, तर आपले मन कितीही शुद्ध व सुंदर असले तरीही कोणी आपल्या जवळ येत नाही तसेच त्यांच्या जवळही येऊ देत नाहीत. म्हणजेच ह्याचा अर्थ हाच निघतो, कि सर्वजण आपल्या शरीराला (बाह्यांगाला) ओळखतांत, आपल्या आत्म्याला नाही, कारण त्यांच्याकडे ते ज्ञान नाही व म्हणून त्यांची दृष्टी देखील वेगळीच असते. यामध्ये आपल्याला हेदेखील लक्षांत घेतले पाहिजे कि आपल्या शरीराला जे दोन मानवी डोळे ईश्वराने दिले, ते फक्त मायाच बघू शकतात, व हि माया सर्व कृतघ्न, निर्दयी व फसवी आहे, आपण सर्वांना हि माया आपल्या आकर्षणात ओढून, आपले (सर्वांचे) निर्दालन करते, म्हणूनच आपल्याला त्यापासून वाचण्याकरता, आपला तिसरा डोळा ज्याला आपण ज्ञान चक्षु म्हणतो, तो उघडावा लागतो, व तो उघडून "ज्ञान" देण्याची क्षमता फक्त आणि फक्त सत्गुरूपाशीच असते. इथे आणखी महत्वाचे सांगावे लागते, ते म्हणजे ज्याप्रमाणे लहान बालक, त्याची आई (माता) वर (म्हणजेच प्रथम गुरु) वर संपूर्ण विश्वास ठेवते. प्रत्येक बालकाचा त्याच्या आई वर एव्हडा विश्वास असतो कि आईने तिच्या बालकाला विष जरी पाजले तरी ते बालक काहीही ना नुकूर न करता म्हणजेच हरकत न घेता प्राशन करते, म्हणजेच प्राशन करण्यास तयार असते. त्याप्रमाणेच "शिष्याला देखील त्याच्या सत्गुरुवर विश्वास असला पाहिजे, जेव्हा सत्गुरू हे ओळखतो, कि माझा शिष्य माझ्यावर पूर्ण विश्वास ठेऊन राहातो, माझी आज्ञा निसंकोच पालन करतो, त्यावेळेस सत्गुरू आपल्या शिष्याला ईश्वरीय ज्ञान म्हणजेच शिष्याचा तिसरा डोळा उघडतो व ईश्वराला पाहण्याचे ज्ञान प्रदान करतो. ह्याकरता शिष्याला आपल्या सत्गुरुवर निस्सीम भक्ती असावी लागते. काळजी करू नका, तुम्ही पुढील पाने वाचत चला, पुढे मानस पूजा कशी करावी ते सांगत आहे, ती सुरु करताच ईश्वर त्याकरता म्हणजे सत्गुरू मिळवून देण्यांस तुम्हा सर्वांना साहाय्यभूत होईलच ह्याची खात्री बाळगा.
    पण आत्ताच थोडे आधी, संध्याकाळी अनेक वाडग्यांत पाणी ठेवून त्यांत चंद्राची अनेक प्रतिबिंबचे उदाहरण बघितले, पण येथे तर, आपण ईश्वराचे नुसते प्रतिबिंब नसून, आपण त्याचाच अंश म्हणजे आत्मा आहोत, हे समजून घ्यायला पाहिजे. तेही तुम्हाला पुढे वाचतांना समजेल.
    त्याअगोदर, कदाचित तुम्ही विसरला असाल, म्हणून तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते, कि ईश्वर, कलीशी बोलतांना, म्हणाला होता, ज्या जनांना, सत्गुरू लाभला नाही, असे जन, जर त्यांची वस्तुनिष्ठता, स्वार्थीपणा, अहंकार, व विषयलोलुपता ह्या गोष्टींचा, त्याग करण्याचा निश्चय करून, ईश्वराची प्रार्थना करून, प्रयत्न सुरु करतील, आणि जसजसे ते ह्या मार्गावर दृढ होण्याचा प्रयत्न करतील व यश मिळवतील, त्यापेक्षा कितीतरी जास्त वेगाने, मी ईश्वर, त्यांना प्राप्त होण्याकरता, त्यांचा मार्ग विस्तार करून, त्यांना सत्गुरू पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करेन. परमेश्वराने पुढे असेही म्हटले आहे, कि जो माझ्याकरता, माझ्या दिलेल्या मार्गावरून एक पाउल पुढे चालतो, तेव्हा मी त्याच्या जवळ येण्याकरता १०० पावले उचलतो. हा परमेश्वराने पूर्ण मानवजातीला दिलेला शब्द आहे, व त्यावर विश्वास ठेवणे, हे आपले काम आहे, व तेच आपल्याला यश प्रदान करेल, ह्यांत कोणतीही शंका बाळगू नका.
    ता तुम्ही विचाराल, एका वेळेस वस्तुनिष्ठता, स्वार्थीपणा, अहंकार, व विषयलोलुपता त्याग करणे, कसे शक्य आहे? कारण एकतर त्याची आपल्याला लहानपणापासून सवयच नाही? वास्तविक पहायला गेले, तर नवीन माणसाला हे तसे सोपेही नाही. परंतु आपण ते, सहज व सोपे करू शकतो. कसे आणि काय करायचे, ते थोडे समजावयास सोपे व अधिक विशद करून सांगतो.


Pg 18
जगाच्या पाठीवर सिनेमा मधल!!
          एक गाजलेलं गाण!

नाही खर्चिली कवडी दमडी |
नाही वेचला दाम ||
विकत घेतला श्याम,
बाई मी विकत घेतला श्याम ||धृ.||
कुणी म्हणे हि असेल चोरी |
कुणा वाटते असे उधारी ||
जन्मभरीच्या श्वासाइतुके |
मोजियले हरिनाम ||धृ.|| २ ||
बाळ गुराखी यमुनेवरचा |
गुलाम काळा संतांघरचा ||
हाच तुकयाचा विठ्ठल |
आणि दासाचा श्रीराम ||धृ.|| ३ ||
जितुके मालक, तितुकी नांवे |
हृदयी तितुकी, याची गांवे ||
कुणी न ओळखी, तरीही याला |
दीन अनाथ अनाम ||धृ.|| ४ ||
गीतकार : ग. दि. माडगुळकर,
संगीतकार : सुधीर फडके,
गायक : सुधीर फडके, आणि
             आशा भोसले.



    प्रथम आपण, वस्तुनिष्ठता, स्वार्थीपणा, अहंकार, व विषयलोलुपता, ह्या चार गोष्टींपैकी शेवटच्या दोन गोष्टी सोडून देऊ, कारण वस्तुनिष्ठता आणि स्वार्थीपणा ह्या दोन अभिलाषाच, ज्यांना प्रथम, आपण आपल्या बालपणीच जन्म दिला, आपल्या आई व वडिलांनी त्यास खतपाणी घातले तसेच आपण त्या काळजीपूर्वक जपल्या व कायम जोपासल्या (वाढतच ठेवल्या), त्या दोन अभिलाषाच, अहंकार आणि विषयलोलुपता ह्या दोन महाभयंकर विकारांना जन्म घालतांत. ह्याचाच अर्थ ज्यावेळेस तुम्ही वस्तुनिष्ठता व स्वार्थीपणावर २५% प्रभुत्व मिळवता, त्यावेळेस ईश्वरकृपेने १५% ते २०% प्रभुत्व, अहंकार व विषयलोलुपतेवर आपोआपच मिळते. असे करत, धीर न सोडता, गंभीरपणा राखत, जो मानव पुढे चालतो, त्याला तो दिवस बिलकुल लांब नसतो, जेव्हा सद्गुरु भेटावयाचा असतो, व सद्गुरु, त्याचे उरले सुरले दोषदेखील, संपवून टाकून, त्याला आपले मानव जीवनाचे उद्धार करून, मोक्ष देखील सहजशक्य करून देतो.
(सुचना : कदाचित ह्यावेळी, म्हणजेच सत्गुरू भेटण्याच्या अगोदर, कली अनेक प्रकारे, मानवाला अशा वेगवेगळ्या यातना, प्रलोभन तसेच तत्सम आकर्षण, दाखवतो तसेच गैरसमजही इतके निर्माण करतो, कि साधारण माणूस, जसा नदीला तुफान पूर येतो, व त्यांत सर्वकाही वाहून जाते, तसेच त्याचा निश्चय वाहून जाण्याची शक्यता भरपूरच (पुरेपूर) असते. म्हणूनच या इथे प्रत्येक मानवाला आपला निश्चय फारच दृढ करणे अत्यंत आवश्यक ठरते. लक्षांत ठेवा, हि अशी वेळ एकदा, किंवा फार तर तीन वेळा येते, त्यानंतर जसा पूर ओसरतो व सगळीकडे शांतता पसरते, त्याप्रमाणे सर्व जीवन शांत आणि सुखमय होऊ लागते.)

    त्तापर्यंत दासने जे काही लिहिले व तुम्ही वांचले, त्यातले, कलीयुगाची सुरवात, व त्याअगोदर परमेश्वराचे व कलीचे झालेले संभाषण, हा भाग सोडला, तर बाकी सर्व, काही लोकांना समजावून सांगितले, पण फक्त काही, बोटांवर मोजू इतक्या लोकांनी आपले स्वतःचे प्रयत्न सुरु केले, व सत्संगाला जाऊ लागले, पण आपण प्रिय वाचकहो, कदाचित तुम्हाला सत्संग मिळत नसेल, तसेच काही अजून ज्ञान मिळवायचे असेल, असे दासला वाटते. कारण हे ज्ञान जरूर फुकट मिळते, परंतु त्याची ज्याला किमत कळते व समजते, त्यालाच ते सहाय्यभूत देखील होते. आज, अजूनपर्यंत माणसाला श्वास घ्यायला हवा फुकट मिळते, प्यायला पाणी फुकट मिळते, तोपर्यंत काही लोकांना त्याची किंमत वाटत नाही, परंतु दासला माहित आहे, कि ज्या लोकांना त्याची किंमत माहित आहे, ते त्यांच्या प्रत्येक श्वासाचा, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर उपयोग चांगल्याच कामासाठी करतांत. तसेच ह्या परमेश्वराच्या ज्ञानाचे देखील आहे. पण लक्षांत ठेवा, जे ह्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून घेत नाहीत, त्यांच्याकरता सांगतो, कि उद्या जरूर एक दिवस असा येईल, ज्यादिवशी परमात्मा तुम्हाला विचारेल, कि ज्ञान फुकट वाटले जात होते, तेव्हा तू कुठे होतांस? त्यावेळेस मान खाली घालून स्वतःची भर्त्सना करून करत बसाल, त्या वेळेस काय त्याचा उपयोग होईल? हा विचार करा. तेव्हा किमान तुमच्यावर अशी वेळ येऊ नये, कि बोलावे लागेल, अहंकारांत व मायेमध्ये बुडालो होतो. प्रिय वाचकहो, अशी आशा करतो, कि तुमच्यावर ती पाळी येऊ नये.
    ता आपण सर्वप्रथम मागे राहिलेला, अत्यंत महत्वाचा विषय, आपला आत्मा आणि परमात्मा ह्यांचा परस्पर संबंध कसा काय आहे? तसेच दोन्ही वेगवेगळेहि नाहीत ते कसे? हे समजून घेऊया. ह्यामध्ये आणखी एक महत्वाची बाब आपण समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे, आपण जरादेखील आपल्या मनांत, कुठल्याही प्रकारचे दुमत, अविश्वास, अहंकार नसला पाहिजे, जसे कि, आपण जन्माला आलो त्यावेळेस, आपण ज्यारीतीने आपल्या आईने सांगितले व शिकवले, व आपण ते सर्व मानत होतो म्हणजेच आपल्या आईवर आपण पूर्ण विश्वास ठेवला, त्यावेळेस जर आपण हेच दुमत, आपल्या आईविषयी अविश्वास, अहंकार, आपल्या मनांत ठेवला असता, तर जे आपण त्यावेळेस घडलो, आपले बालपण सुखांत गेले, ते शक्य झाले असते का? तसेच येथेही नेमकी तीच वस्तुस्थिती आहे, हे लक्षांत असू द्या. कारण येथे प्रश्न तुमच्या ह्या शरीराच्या पूर्ण आयुष्याचाच नव्हे तर हे शरीर सोडल्यावर परमेश्वरामध्ये विलीन (मोक्ष) मिळवण्याचा देखील आहे, हे कृपया ध्यानी असुंद्यात व ह्यांतच तुमचे कल्याण आहे.
    दासला असे वाटते, कि तुम्ही, तुमच्या मनाने आता पूर्ण समजून घेण्यांस तयार आहांत. आता तुम्हाला एक वेगळ पण व्यवस्थित समजेल अस छान उदाहरण देतो. जसे कोणत्याही एका संध्याकाळी कुठल्याही एका स्वतंत्र रुममध्ये, एक बरीच मोठी अशी मेणबत्ती घ्या, व तिला पेटवून एका मोठ्या लांब आणि रुंद टेबलाच्या कोणत्याही एका कडेला, किंवा टेबलाच्या अगदी मधोमध, टेबलाच्या पृष्ठभागाला चिकटवा. आता काही लहान मेणबत्त्या साधारण वीस पंचवीस किंवा तीस ते पस्तीस, जशा जमतील तशा घ्या, आता ह्या लहान मेणबत्त्या, एक एक करून, मोठ्या मेणबत्तीच्या ज्योतीच्या सहाय्याने पेटवून, मोठ्या मेणबत्तीच्या थोडे अंतर सोडून सभोवताली, किंवा अगदी थोडे अंतर सोडून, कुठल्याही एका बाजूला चिकटवत चला. सर्व लहान मेणबत्त्या पेटवून चिकटवून झाल्यावर, आता त्या संध्याकाळच्या वेळेला, आपल्याला काय दिसेल? ज्या रुममध्ये, ज्या टेबलावर अंधार होता, तेथे आता एका मोठ्या मेणबत्तीचा व अनेक लहान मेणबत्त्यांचा मिळून झालेला, एक मोठा प्रकाश, जो पूर्ण रूमला प्रकाशमान करत आहे. आता विचार करा, कि काय तुम्ही कुठल्याही मेणबत्तीला, तिथून न काढता, कुठल्याही एक मेणबत्तीचा किंवा अनेक मेणबत्त्यांचा फक्त प्रकाश वेगळा करू शकता का? आता उत्तर असेच येईल, नाही, आपण काहीही उपाय केला तरीही फक्त प्रकाश वेगळा होऊ शकत नाही. असेच नेमके आपले व परामात्माचे आहे. येथे "परमात्मा" म्हणजे मोठी मेणबत्ती, व आपण "आत्मा" म्हणजे लहान मेणबत्ती, व आपला सर्वांचा मिळून पडलेला प्रकाश हेच ते "परम तत्व." आता, जरा सखोल विचार करा, तुम्हाला आपोआप पटेल, कि प्रत्येक माणसाचा स्वतःचा प्रकाश असतो, व ज्यावेळेस परमात्मा तो त्याचा प्रकाश म्हणजेच "परम तत्व" काढून घेतो, त्यावेळेस आपण त्या शरीराला (मेणबत्तीला) मृत शरीर असे घोषित करतो.
    येथे आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत, जे आपल्या लक्षांत येणे खूप जरुरीचे आहे. जसे आपण जाणता, आपल्या शरीरांत रक्त, मांस व हाड असतांत. साधारणत: कुठल्याही प्रौढ माणसाच्या शरीराच्या रक्तांत, लाल व सफेद मिळून ३७.२ खरब जिवंत पेशी असतांत, आणि प्रत्येक मांसाचा मायक्रो मिली ग्राम भाग हा जिवंत असतो, तसेच हाडांमध्ये जो पोकळी असते, त्यांत "बोन मौरो" म्हणून जो भाग असतो, तो देखील मांसाप्रमाणेच जिवंत असतो. त्याचप्रमाणे सर्व शरीराचे आंत काम करणारे अवयव देखील स्वतंत्ररीत्या जिवंत असतांत, याइथे विज्ञानाने मानले आहे कि व्यक्तीच्या शरीरांत १० प्राण अस्तित्व करून असतात, व ज्यावेळेस मेंदू आपले कार्य थांबवतो (ज्याला ब्रेन डेड म्हणतात) त्यावेळेस ती व्यक्ती "मृत शरीर" म्हणून डॉक्टर घोषित करतात, म्हणूनच आपल्या शरीराचे भाग जे दान देण्या योग्य असतील ते सर्वकाही आपण ते दान म्हणून कुणालाही देऊ शकतो. ह्याचाच अर्थ असाही होतो, कि ह्या आपल्या शरीरांत, अनेक खरब पटीने, नैनो मेणबत्ती (प्राण, आत्मा) जिवंत आहेत, व त्या सर्व अति लहान मेणबत्ती करता, आपणहि एक मोठी मेणबत्ती ठरतो. काय कशी वाटली? परमेश्वराची संरचना? आहे कि नाही अदभूत!

ह्यापुढे आपण सर्व वाचकहो तुम्हाला आणखी एक असे उदाहरण वाचावयास मिळेल, कि ते उदाहरण स्वयं श्लोकांमध्ये दिले गेले, तो श्लोक व त्याचा संपूर्ण अर्थ विशद करून, दास आपणांस जरूर सांगेल. आपण मात्र एकभाव व एकचित्त करून ते पुढील पानांत वाचावे, परमेश्वर सगळ्यांवर निश्चित आपली कृपा करेल, हि खात्री बाळगा.)


आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

Sunday, September 20, 2015


पान नंबर १५ व १६
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 15

    स्वयं सद्गुरु नृसिंहसरस्वतीजींनी, सद्गुरु व त्रयमुर्तींची पर:ब्रह्माची दिलेली ओळख.
श्लोक :
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुः साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः ||


टीका :
गुरु म्हणजे ब्रह्मा, गुरु म्हणजे विष्णू, गुरु म्हणजेच ईश्वर महेश्वर |
गुरुच्या ठायी साक्षात, हि त्रैशक्ती म्हणजेच एकवटलेल पर:ब्रह्म आहे,
अशा त्या गुरूला, माझे नमन आहे ||


विशद :
स्वयं ब्रह्मा गुरुंच्या ठायी असतो, स्वयं विष्णू गुरुंच्या ठायी वसतो,
स्वयं ईश्वर महेश्वर गुरुंच्या ठायी रहातो.
स्वयं ह्या त्रैशक्ती म्हणजेच पर:ब्रह्मच्या परमतत्वाची
ज्याला ओळख आहे, म्हणूनच संपूर्ण पारब्रहम ज्याच्यापाशी आहे,
त्यामुळेच त्या पर:ब्रह्माची त्यांच्यावर असीम कृपा आहे, म्हणून असा गुरु आपल्या शिष्याला ते ज्ञान, ती परमेश्वराची ओळख, प्रदान करू शकतो, अशा त्या गुरूला, माझे नमन आहे.

हे तर, सद्गुरूचे मुख्य वर्णन झाले, ह्यापुढे, अजूनही श्रीमद्सद्गुरू नृसिंहसरस्वतीजींनी, श्रीसद्गुरु कसा व परमेश्वर कसा अनुभूत आहे, ह्याचे केलेले अतिसुंदर वर्णन, ह्यापुढे प्रसिद्ध होणार्या पानांमध्ये आपण निस्सीम वाचकांकरता, जरूर प्रसिद्ध होईल.



    तापर्यंत आपण पाहिले, कि परमेश्वर आणि कली ह्यांच्या दरम्यान, कलियुगाचे आगमन होण्यापूर्वी काय संभाषण झाले. त्यांत कलीने काय योजना ठरवायचा प्रयत्न केला? काय त्याच्या योजना स्वयं परमेश्वराकडून मान्य करून घेण्यांत तो यशस्वी झाला. परमेश्वराने त्याला काय निर्बंध व नियम लावले, व ते पाळण्यास सांगितले?
    तापर्यंत जर तुम्ही नीट व व्यवस्थित संपूर्ण वांचले असेल, तर तुमच्या लक्षांत आले असेल, कि कलीने त्याच्या योजना कशाप्रकारे आखल्या. कली हा एक स्वयं ईश्वराची, कलीयुगात प्रमुख एक अशी शक्ती, त्याला "कालात्मा" व "वेग" अशा सहाय्यक शक्तींची मदत मिळून, कली, एक स्वयं परिपूर्ण अशी परंतु परमेश्वराने त्याला नियम घालून दिले अशी ताकदवान शक्ती निर्माण होऊन, त्याला संपूर्ण पृथ्विलोकांत आपले काम करण्यांस, जवळपास स्वयं परमेश्वराच्या इतकीच वेगवान आणि प्रबळ अशी यंत्रणा, संपूर्ण पृथ्विलोकी, सर्व ठिकाणी एकाच वेळी, कार्यान्वित व स्थापित करता येऊ शकली, तसेच त्यांत बदल व नवीन योजना करणे व पार पाडणे कलीला सहजशक्य होऊ लागले.
    प्रामुख्याने तुम्ही हेही लक्ष्य दिले असेल, कि त्याला परमेश्वराने काय नियम व मर्यादा आखून दिल्या? मानवाला त्याच्यापासून वाचण्यासाठी काय काय मार्ग अगोदरपासूनच परमेश्वराने प्रशस्त करून ठेवले? आता तुमच्या हेही लक्षांत आले असेल, कि माणूस स्वतः आपणहून आपला कसा नाश करून घेतो? तसेच आपले जीवन कसे उद्धरु देखील शकतो?
    माझ्या प्रिय वाचकहो, ह्यांत घाबरण्यासारखे, पळून जाण्यासारखे, काहीच नसून, आता तुमच्या लक्षांत आले असेल, कि कली, हा काही पिशाच्च किंवा काही दुरात्मा नसून, जशा इतर देवता आहेत, उदा. अग्निदेव, पवनदेव, किंवा सूर्यदेव आहेत, अशींच एक देवता (शक्ती) आहे. त्यामुळे हि देवता देखील, आपण आपल्या मनांत, त्याच्याकरता, तिरस्करणीय असा कोणताही भाव न ठेवता, आदरणीय भावच ठेवला पाहिजे कारण तो देखील ईश्वराने त्याला दिलेले कामच करत आहे. जसे आपण शनिदेवाला देखील आदर व सन्मान देतो, परंतु त्याच्या वाटेला मात्र जात नाही, त्याचप्रमाणे आपण कलीदेवाच्या बाबतीत देखील वागले असतां, हि देवता देखील आपल्या वाटेला न जाता, आपल्या मार्गावरून जाण्यास फारसा प्रतिबंध करणार नाही. तरीपण सावध रहाणे हे केव्हाही उत्तमच. कारण आपले मन हेच फार उच्छरुंकल असते, व त्यामुळेच धोका संभवतो. आपले मन असे उच्छरुंकल का होते? हा देखील एक अभ्यासाचा विषय आहे, त्याबद्दल सुद्धा आपण नंतर बघू.
    र्वप्रथम आपल्याला "सर्वशक्तिमान परमेश्वराची" ओळख करून घेतली पाहिजे. आपण सर्व त्या परमेश्वराची कल्पना करतो. आपण असे म्हणतो, ह्या परमेश्वराला आत्तापर्यंत कोणीही पाहिले नाही. काय हे सत्य आहे? कि कोणीच परमेश्वराला पाहिले नाही? हे चूक आहे, हे सत्य होऊ शकत नाही, तुम्ही विचाराल कसे काय? कारण असे असते तर ह्या जगांत नामदेव महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी, जसे संत, तसेंच इसा मसीह, व हजरत महंमद पैगंबर सारखे त्या परमेश्वराचे प्रेषक निर्माण झालेच नसते.
    सेंच तुमच्या लक्षांत आणखी एक महत्वाची बाब आणून देऊ इच्छितो, जेव्हा तुम्ही लहान होतांत, तुमच्या आईने, तुमची ओळख, हे तुझे पपा (बाबा), हे तुझे काका, हि तुझी मावशी, असे करत वारंवार सांगून, त्यांची तुम्हाला, व तुमची तुम्हाला स्वतःची ओळख करून दिली, आणि तुम्ही ते मान्यहि केले. आता तुम्हाला असे विचारतो, कि तुम्ही ते का मान्य केले? त्याचे उत्तर असेंच येते, कि त्या वेळी, तुम्ही लहान होतांत, तुम्हाला स्वतःला, स्वतःचा स्वार्थ, अहंकार, अहंमान्यता, असे सर्व काहीच नव्हते, तुम्ही एका आज्ञाधारक शिष्यासारखे, म्हणजेच ह्या पृथ्विलोकी, ह्या मायारूपी संसारांत, कसे वागायचे, जगायचे ह्याची शिकवण तुमच्या आईकडून घेतली. तुम्ही तुमच्या मनांत, त्यावेळी काहीही दुजाभाव न ठेवता, तीने जे सांगितले ते सर्व, तुम्ही तुमच्या आईकरिता तुमचे संपूर्ण समर्पण, ह्याच भावनेने ते मान्य केले. ह्याचाच अर्थ १००% तुमची आई, हि तुमची "सर्व प्रथम गुरु" म्हणून तुम्ही तीला मान्य केले, ह्याचाच अर्थ ती तुमची प्रथम "गुरु" म्हणून सिद्ध (साबित) झाली, आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या लहानपणी यशस्वीही झालांत. हे तुम्हाला मान्य करायला हवे. तसेच तुम्हाला हेही मान्य करावे लागेल कि ज्यावेळेस तुम्हाला वाटले कि जगांत तुम्ही स्वतः एकट्याने चालू किंवा राहू शकता, त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईचा हात सोडून दिलात म्हणजेच तुम्हाला तुम्हीं स्वतः एक स्वयंपूर्ण व्यक्ती असे समजू लागलात, आणि वास्तविकता काही वेगळीच आहे हे मान्य करायला लागते, कारण आपण परमेश्वराची ओळख तर विसरूनच गेलो. पूर्वीच्या काळी, मुंज वगैरे विधी झाल्यानंतर साधारण ५ ते ७ वर्षे वयापासून विद्यार्थ्याला गुरु आश्रमांत पाठवून द्यायचे व तिथूनच त्याला विद्याभ्यास झाल्यावर सत्गुरुकडे पाठवले जायचे, परंतु आजच्या काळांत ते सर्वकाही राहिलेच नाहि, म्हणून काय आपण आपले जीवन व्यर्थ घालवायचे? नक्कीच नाही.


Pg 16

समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली, गणपतीची मूळ ७ कडवीं ची आरती.
सुखकर्ता दु:खहर्ता, वार्ता विघ्नांची |
नुरवी पुरवी प्रेम, कृपा जयांची ||
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची || १ ||
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे, मनकामना पुरती || धृo ||
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा |
चंदनाची उटी, कुंकुमकेशरा ||
हिरेजडीत मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे, चरणी घागरिया || जयo || २ ||
माथा मुकुट मणी, कानी कुंडले |
सोंड दोंदावरी, शेंदूर चर्चिले ||
नागबंद सोंड, दोंद मिरविले |
विश्वरूप तया, मोरयाचे देखिले || जयo || ३ ||
चतुर्भुज गणराज, बाही बाहुटे |
खाजयाचे लाडू, करुनी गोमटे ||
सुवर्णाचे ताटी, शर्करा धृत |
अर्पी तो गणराज, विघ्ने वारितो || जयo || ४ ||
छत्र चामरे, तुजला मिरविती |
उंदीराचे वाहन, तुजला गणपती ||
ऐसा तू कलीयुगी, सकळीक पाहसी |
आनंदे भक्तासी, प्रसन्न होसी || जयo || ५ ||
ता ता धि मी किट, धि मी किट नाचे गणपती |
ईश्वर पार्वती, कौतुक पाहती ||
ताल मृदुंग वीणा, घोर उमटती |
त्यांचे छंदे करुनी, नाचे गणपती || जयo || ६ ||
लंबोदर पितांबर, फणीवर वंदना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना ||
दास रामाचा, वाट पाहे सदना |
संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना
|| जयo || ७ ||
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे, मनकामना पुरती || धृ ||
        !! गणपती बाप्पा मोरया ||

    ता इथेच थोडा आणखी विचार करुया, कि काय तुम्ही तुमच्या आईवर, तुमच्या संपूर्ण समर्पण भावना न ठेवता, स्वार्थ, अहंकार व अहंमन्यता ह्यांसारखे क्षुद्र विचार मनी ठेवून, विश्वास ठेवला नसता, तर काय झाले असते? तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनांत, संसाररूपी भवसागरांत कसे जगला असतांत? येथे आपल्याला मान्य करावे लागेल, कि ज्याच्याकडून ज्ञान प्राप्त करायचे असेल, त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवणे, हे अत्यधिक गरजेचे होते. अन्यथा ते ज्ञान प्राप्त होणे, हा नुसता कल्पना दुर्विलासच ठरतो. हेच नेमके गमक आहे. आणि इथेतर आपल्या आयुष्याचा, आत्म्याच्या उद्धाराचा प्रश्न आहे, म्हणूनच आपला, पूर्ण विश्वास व पूर्ण समर्पण अत्यंत आवश्यक ठरते. आता येथे प्रश्न उठतो, गुरु आणि सत्गुरू ह्या दोघांत काय फरक आहे? पण तुर्तांस ह्या प्रश्नाकडे नंतर बघुया, कारण प्रथम येथे आपला विषय चालू आहे, परमेश्वर काय आहे? व त्याची ओळख आपण कशी करून घेऊ शकतो.
    काय तुमचा इतिहासावर विश्वास आहे? काय त्या सर्व भाकडकथा म्हणून मानता? ते सर्वांमधले काही, उदा. संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत मीराबाई, गौतम बुद्ध, हजरत महंमद पैगंबर, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, आणि जीसस ख्राइस्ट हे सर्व संत, ह्या पृथ्वीवर आले, त्यांनी लोककल्याणार्थ आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले, हे आपण वाचतो, तसेंच हे सर्वांना माहित आहे.
    काय तुम्हाला असे वाटते, कि ते काय त्यांच्या जन्मापासूनच संत होते? नक्कीच नाही. मग हे कसे काय घडले? त्यांना त्यांच्या आंतरिक प्रबळ इच्छेनेच परमेश्वराला त्यांच्या अधीन होण्यास भाग पाडले, हेच निर्विवाद सत्य आहे. त्यांनी जेव्हा ईश्वराचे अस्तित्व जाणले, त्यानंतर मानले, तेव्हा त्यांना परमेश्वराच्या मानव व निसर्गाप्रती काय भावना तसेच इच्छा कळल्या, त्यामुळेच त्यांना साधारण मानवांच्या हातून होणाऱ्या चुका कळल्या, अर्थात त्याचमुळे त्यांनी समाज परिवर्तन करण्याच्या दृष्टीनेच आपले जीवन वेचले, व जगाला भक्तिमार्ग दाखवून, तसेंच समजावून दिला. ह्यामध्ये आणखी एक महत्वाची बाब लक्षांत घेतली पाहिजे, ती ही, कि जसे तुम्ही पहाता कि स्वतःला सत्गुरू म्हणवून घेणारे दुसऱ्यांना तुच्छ समजतात व आरोप व प्रत्यारोप करत असतात, तसे त्यांनी कधीही एकमेकांच्या विरुद्ध टीका, किंवा टिपण्णी केली नाही, भले ते एकमेकांच्या कालखंडात असोत किंवा नसोत. कारण उघड आहे, त्यांनी एकाच ईश्वराचे ज्ञान घेतले व त्याच ईश्वराचे कार्य पार पाडले. दोष नेहेमी आपल्यांतच राहिला, कारण आपण सर्व काही संशयानेच पहात असतो, आणि त्या संतांचे महत्व कळले कि ते संत ज्या ठिकाणी राहिले, ज्या वस्तू वापरल्या, ज्या दगडावर बसले, त्याचीच (त्या जागेची, दगडाची, आसनाची) आरती व पूजा करू लागलो, त्या संतांनी जे सांगितले, त्या वचनांकडे आपले लक्षच नाही, हे खरे नाही तर काय आहे? आणि म्हणूनच आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी लक्षांतच येत नाहीत. काय तुम्हाला वाटत नाही? कि हा दोष आपले संपूर्ण जीवनच नेस्तनाबूत करून टाकेल? म्हणूनच सर्वप्रथम काही महत्वाच्या गोष्टी पटल्यावर हा दोष आपण, आपल्यातला स्वतः होऊन कायम काढून टाकला पाहिजे. जसा विश्वास, जसे समर्पण, आपण आपल्या "प्रथम गुरु आई" बद्दल बाळगला, व ठेवला, तसाच विश्वास व समर्पण, परमेश्वराला व सत्गुरुला देखील अपेक्षित असतो. कारण त्याशिवाय योग्य अभ्यास व नंतर त्यावर चालणे, शक्यच होऊ शकत नाही. तुम्हीच सांगा तुम्ही एका "क्ष: व्यक्तीला त्याच्या चांगल्या किंवा वाईट वेळेतून अधिक चांगले घडण्यासाठी, तुमच्या दृष्टीने काही चांगला व योग्य असा सल्ला दिलात! आता ती "क्ष" व्यक्ती त्याप्रमाणे चालली नाही, व त्या "क्ष" व्यक्तीने आपले स्वतःचे नुकसान करून घेतले, तर काय तुम्ही त्या "क्ष" व्यक्तीला परत त्याच्या चांगल्या किंवा वाईट वेळेला काहीही सल्ला किंवा काही मार्ग सांगाल का? अशा वेळेस "तुमचे उत्तर नाही म्हणूनच असेल". ह्याचा अर्थ काय होतो? निश्चितच असे प्रतीत होते कि जिथे कोणतेही अज्ञान घालवून ज्ञान घेण्याचा प्रश्न येतो, तिथे संपूर्ण विश्वास हाच कामी येतो अन्यथा काहीच कामी येणार नाही असेच कोणतेही प्रकारचे ज्ञान अर्जन (घेणे) करतांना दिसून येते.
    ता पुढे आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया, तर आपण ईश्वराची ओळख, व त्याचे अस्तित्व समजून घेऊ. तसेंच थोड आधी, काही समजावणे जरुरी आहे असे वाटते. ते असे, कि परमेश्वर हा काहीएक किंवा अनेक पदार्थांपासून बनलेला देह किंवा काही वेगवेगळ्या आकृतीमध्ये सीमित रहाणारा नसून, ती एक अखंड, ज्याची कुठेही सुरवात नाही कि कुठेही शेवट नाही असे अमर्याद, एक वेगळेच तत्व ज्याला काहीच व कोणतीही उपमा (प्रकार, म्हणजे कुठल्या प्रकारचे असे वर्णन) देता येऊ शकत नाही असे वेगळेच तत्व , व वैश्विक ताकदीची कि तिथे करोडो सुपर कम्प्युटर बसवले तरी कमीच पडतील अशी हायपर टेक्नॉलॉजि असलेली अशी एक ईश्वरीय शक्ती आहे, जी एका मुंगीलाच काय तर संपूर्ण ब्रह्माण्डाला नुसते नियंत्रित करत नाही तर प्रत्येक जीवाचं भरणं पोषण व जन्म-मृत्यू देखील त्याच्या हातांत आहे. ही शक्ती कोणत्या स्वरूपांत आपले कार्य करंत असते? ह्यांबद्दल आपण यापुढे पाहुया.
    रमेश्वर हा "परम तत्व" स्वरूपांत संपूर्ण ब्रह्मांडात स्थित असून, आपण त्या शक्तीला, आपल्या मानव देहाला असलेल्या, आपल्या मानवी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, ह्याबद्दल भगवद गीता, बायबल, कुराण मध्ये लिहून ठेवले आहे, कि हे "परम तत्व" अखिल ब्रह्मांडात व्यापून असून, किंचित काही एक जागा रिकामी अशी सापडू शकत नाही, कि जिथे हे "परम तत्व" नाही. आपली मानवी डोळ्यांची नजर, किंवा कोणत्याही शक्तिशाली दुर्बिणीची नजर, पोहोचू देखील शकणार नाही, असे त्याचे अस्तित्व आहे, हा परमेश्वर अखंड असून, त्याची कुठूनही सुरवात नाही कि अंतही नाही. ह्या परमेश्वराला जाणणे, हे फक्त सत्गुरुला शरण गेल्यावरच शक्य होऊ शकते. तसेंच हे सांगू इच्छितो, सद्गुरु मिळणे, हे देखील, ज्याची खरी श्रद्धा व संपूर्ण समर्पण भावना असते, त्याला हा मार्ग देखील परमेश्वर स्वतः प्रशस्त करून देतो, हे स्वअनुभवावरून सांगतो, कि हे निश्चितच निर्विवाद आणि अटळ सत्य आहे.
    रमेश्वराचे "परम तत्व" चे वर्णन "भगवद गीता" मध्ये फार सुंदररीत्या केलेले आहे, ते अशा प्रकारे :
श्लोक :
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः .
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः २.२३


टीका :
"परम तत्व" हे कधीही कोणत्याही, शस्त्राने छेद व कापले जाऊ शकत नाही.
"परम तत्व" हे कधीही कोणत्याही, प्रकारच्या अग्नीने जाळले जाऊ शकत नाही.
"परम तत्व" हे कधीही कोणत्याही, द्रव पदार्थाने, भिजवले, किंवा वाहून जाऊ शकत नाही.
"परम तत्व" हे कधीही कोणत्याही, दाबाच्या वायुने उडवले जाऊ शकत नाही.


विशद :
"परम तत्व" हे एक असे परमेश्वराचे अस्तित्व आहे, कि कुठल्याही अस्त्र, शस्त्राने, अग्नीने द्रव पदार्थाने, तसेच हवेच्या दाबाने, बाधित होणे शक्य नाही.
म्हणूनच त्याचे अस्तित्व अजर व अमर आहे, व रहाणार.
म्हणूनच त्याला कुठेही सुरवातही नाही, तसेच कुठेही अंतही नाही.
म्हणूनच त्याला कुठेही कुठल्याही प्रकारचा गंधही नाही, किंवा सुवासही नाही.
म्हणूनच त्याला कुठेही कुठल्याही प्रकारचा आकृतीचा बंध नाही. म्हणूनच त्याला कुठेही कुठल्याही प्रकृतीचा किंवा निसर्गाचा यम वा नियम लागू होत नाही.
म्हणूनच हा कायम अजर-अमर व निर्लेप रहातो, कुठलेही बाह्य आवरण ह्यास लागू होत नाही व त्याला आवश्यकता नाही.
आणि म्हणूनच हा परमेश्वर आदी, अनादी काळांचा मालक, सर्व ब्रह्मांडाला चालवणारा, कायम धायम असा एकच अनभिषिक्त स्वामी आहे, व पुढेही कायम, धायम रहाणार.

    ह्या "भगवद गीता" च्या वर्णनाप्रमाणे उद्या ब्रह्मांडामध्ये जरी केवढीही मोठी प्रचंड उलथापालथ झाली, तरी ह्या परमेश्वराच्या अस्तित्वाला धोका संभवत नाही वा असूच शकत नाही. आता ह्याला जोडूनच पुढे आपण हे समजून घेतले पाहिजे, कि आपला "आत्मा" देखील, भगवत गीता मध्ये सांगितल्याप्रमाणे, ह्या परमात्माच्या, परमेश्वराच्या "परम तत्व" चाच भाग आहे, म्हणूनच आपला आत्मा देखील अजर व अमर आहे, व रहाणार. आता हे कसे सिद्ध होते, ते पुढे आपण पहाणारच आहोत. तत्पूर्वी आपल्याला आणखी काही गोष्टी समजून घेणे फारच आवश्यक ठरते. ते प्रथम पुढील प्रसिद्ध होणाऱ्या पानांत पाहुया.


आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

Tuesday, September 15, 2015


पान नंबर १३ व १४
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 13

    रमेश्वर, पुढे पापांचे विश्लेषण, सांगू लागत म्हणाला, पापांचे गुण व त्यांची फलत्पत्ती अशींच असते, जिथे निर्मम वाक्य मुखांतून उच्चारण होते, तो पापी म्हणूनच जाणावा. जेथे पाप जास्त असेल, तेथे दैन्य (अज्ञान व गरिबी), मत्सर, शुभाशुभ ची चाड नसणे, हे पापच जाणावे. एखाद्या गरीबाला, दु:ख कशी प्राप्त होतांत, अपस्मार कसा प्राप्त होतो, ते पापरूपी भोग म्हणूनच समजावे. समस्त रोगांमध्ये त्वचाकुष्ठ व आंत्रकुष्ठ हा फक्त मानव शरीराचे सोळा भागच व्यापत नाही, तर त्यापेक्षा अधिकच राहतो, तोच प्रादुर्भाव वेदधर्म मुनी दु:खीकष्टी होऊन, भोगत होता.
    से अन्य सर्व आपल्या गुरुचे गुणदोष, आपल्या ध्यानीमनी न बाळगता, आपल्या गुरूलाच विश्वेश्वर नारायण स्वरूप मानून संदीपक आपला गुरु सेवाधर्म पार पाडत राहिला. आता ते दोघे काशीनगरी वास करून राहिले होते, बरीच तीर्थस्थान, काशी विश्वेश्वराचे, व इतर देवांची मंदिर देखील जवळच होती, पण संदीपक त्या तीर्थांना तीर्थस्नान तसेच मंदिरांना देवदर्शन करायला न जाता, आपल्या गुरूंचेच दर्शन हेच काशी विश्वेश्वराचे दर्शन मानून, प्रणिपात करायचा. आपल्या स्वतःची, आपल्या देहाची तमा न बाळगता, दुसऱ्या कोणाशीही न बोलता, अबोल राहून, रात्रंदिवस एकच ध्यास, आपल्या गुरूची सेवा प्रमाण मानून, निर्धार करून, सेवा करत होता. आपला गुरु म्हणजेच, ब्रह्मा,विष्णू व महेश, असे संदीपकने, पुराणांत लिहिल्याप्रमाणे तेच सत्यवचन मानून, आपल्या मनाशी ठाम राहून, आपले सेवाव्रत त्याने पुढे चालूच ठेवले.
    धी त्याचे गुरु त्याला अत्यंत कटू शब्दांत, तर कधी अत्यंत निष्ठुरपणे आज्ञा देत, कधी वेदनांनी त्रस्त होऊन वाटेल तसे वागत, पण संदीपक कधीही त्यांचा अवमान न करता, त्यांना ज्यायोगे सुख वाटेल, आराम पडेल असेंच वागायचा व बोलायचा, त्याने कधीही त्यांच्या विरुद्ध एकही ब्र शब्द मुखातून काढला नाही कि आपल्या मनीही येउन दिला नाही. तसेच त्यांची प्रत्येक आज्ञा शिरसावंद्य मानून पार पाडायचा. त्याचे एकूणच आपल्या गुरुप्रती असे वर्तन होते, कि जणू जशी एक पतिव्रता स्त्री आपल्या पिडीत पतीची सेवा करेल, किंबहुना त्याच्यापेक्षाही बहुधा जास्तच वरचढ ठरेल, अशी आपल्या गुरूची काळजी शिष्य संदीपक त्या समयी निरंतर घेत होता.
    सांच काही काळ क्रमत गेल्यांवर, एक दिवस, शिष्य संदीपकच्या समोर अचानक, जगनियंता त्याच्या सन्मुख येउन उभे ठाकले, व त्याला वर माग असे म्हणून, म्हणाले, अहो गुरुभक्त संदीपका, तू महाज्ञांनी असून, तुझ्या भक्तीला पाहून मी संतुष्ट पावलो, व तुझ्यावर प्रसन्न झालो, म्हणून तुला वरदान देणे, मला भाग आहे, तरी तू वर माग.
    रमेश्वराचे बोल ऎकुन, तो आज्ञाधारक शिष्य संदीपक, म्हणाला, हे, मृत्युंजय व्योमकेशी, मी तर ह्याबाबतीत माझ्या गुरुंना काहीएक विचारले नाही, त्यांना न विचारता, त्यांची कोणतीही परवानगी न घेता, मी कदापि वर घेऊ शकत नाही.कृपा करून तुम्ही थांबा, मी माझ्या गुरुंना विचारून येतो असे म्हणून संदीपक तेथून आपल्या गुरूंची आज्ञा (परवानगी) घेण्यास निघाला.
    शिष्य संदीपक आपल्या गुरूंपाशी जाउन, त्याना सांगू लागला, माझ्यावर विश्वेश्वरनाथ प्रसन्न होऊन, मला वर देण्यास आले आहेत, ते कसे आले? का आले? मला त्याचे ज्ञान नाही. हे गुरुराया जर तुमची आज्ञा असेल, तर तुमची हि व्याधी (कुष्ठ, रोग) बरे होण्याचा काही उपशम (उपाय, इलाज) मागतो व बरे होण्यासाठी वर मागतो. जर ईश्वर सदाशिवाने तसा वर दिला, तर बरे होईल, तुमचा ह्यापुढचा त्रास वाचेल, तुम्हाला हे सर्व भोग भोगायला लागणार नाहीत.
    हे शिष्य संदीपकचे वचन ऎकताच, त्याचे गुरु, वेदधर्म मुनी, त्याच्यावर कोपायमान झाले (रागावले). व रागारागातच संतापाने म्हणाले, माझ्या ह्या व्याधीनिमित्त (रोगाकरता) त्या ईश्वरापाशी काहिएक प्रार्थना करू नकोस, व आपल्याला त्याची गरजही नाही. जर आपल्या पातकांना आपण भोगले नाही, तर त्या पापांची निष्कृती होत नाही, आणि ती पाप निश्चितच जन्मजन्मांतरी पुढे कायमच बाधतच रहातांत, हे धर्मशास्त्रांत लिहून ठेवले आहे. ज्याला मुक्ती (मोक्ष) मिळवायची कामना (ईच्छा) असेल, त्याने त्याची पाप, आपले भोग भोगूनच नष्ट म्हणजेच निर्दालन करावीत, जर काहीजरी बाकी राहिली, तर ती, त्याच्या मोक्षसमयी त्याला बाधाच करतांत. म्हणून हे संदीपक, ईश्वराजवळ तू काहीही व कोणत्याही वराची प्रार्थना अथवा मागणी करू नकोस.
    गुरूंची आज्ञा प्रमाण मानत, संदीपक, जो ईश्वराजवळ वर मागून आपल्या गुरुची व्याधी, रोग संपवता येईल, अशा मोठया आशेने आपल्या गुरूपाशी आला होता, तो तसाच ईश्वर सदाशिवापाशी परतला, व ईश्वरासमोर जाउन म्हणाला, मला काहीएक वर नको आहे, माझ्या गुरुंच्या मनाला ते पटत नाही, तर मी कसा काय तुमच्याकडून वर मागू? किंवा घेऊ शकतो?
    हे ऎकुन विश्वेश्वराला महदाश्चर्य वाटले, व विस्मय करतच आपल्या कार्यस्थळी निर्वाणमंडपी गेला, व समस्त देवांना पाचारण (बोलावणे) करून, सभेमध्ये भगवन श्रीविष्णूपुढे सारा वृतांत सांगू लागला, तेव्हा श्रीविष्णू शंकरांस विचारू लागले, हा कोण गुरु आणि कोण शिष्य आहे? त्यांचा रहिवास (वस्ती, रहाणे) कुठे आहे? सर्वकाही विस्ताराने सांगा.
    तेव्हा ईश्वर श्रीविष्णूला सांगू लागले, गोदावरी तीरावर रहायचे, व आता उत्तरदेशांत मणिकर्णिकेला, कम्बळेश्वर जवळ, वेदधर्म नांवाचा एक तापसी मुनी व त्याचा एक संदीपक नांवाचा शिष्य, जो आपल्या गुरूची अहर्निश अखंड एकभाव एकचित्त करून सेवा करत आहे. पण असा निर्गुण राहून गुरुभक्ती करणारा, ह्या पूर्ण त्रैयलोक्यांत मी आजवर पाहिला नाही व त्यामुळे मला राहवले नाही. त्याची गुरुभक्ती व गुरुप्रती अपरंपार प्रेम बघून, मी त्यांच्यावर अत्यंत खुश होऊन, त्याला, जो मागेल तो वर देण्यांस तत्पर झालो व ईच्छावरदान देईन म्हणून त्याच्याजवळ गेलो, पण गुरु आज्ञा नाही असे म्हणून, त्याने वर घेण्यांस मला नकार दिला. जेथे त्र्क़्रुषीमुनी व तपस्वी, अनेक प्रकारे नाना कष्ट सायास करंत, अहर्निश वर मिळण्याची कामना करत, तप करतांत, तर केवळ इच्छित वराची कामना करीत हजार हजार वर्ष जपकरत असतांत, अशा जपी, तपी, व तपस्वी जनांना, जेथे वर द्यावे इतके मन प्रसन्न होत नाही, तेथे मी त्याची गुरुभक्ती पाहून, प्रसन्न होऊन, स्वतःहून वर द्यावयास गेलो तर, तो शिष्य दीपक, मला नाही म्हणून सांगतो. त्याने तनमन अर्पण करून, संतोष भावे आपल्या गुरूलाच त्रयमुर्ति मानून, आपल्या मनाशी गुरूलाच परमात्मा जाणून, त्याने स्वतःला निश्चयपूर्वक आपल्या गुरूलाच वाहून घेतले आहे. त्याची सेवा पाहून, अविद्या अंधकाराला छेदणारा असा कुलदीपक हेच त्याचे नांव, असे सार्थ व सत्य मला वांटते, जसे पूर्ण धर्म व ज्ञान त्याच्यापाशी एकवटले आहे असेच वाटते. त्याचा गुरु, त्याची भक्ती व गुरुपादसेवा पाहून, कुलदीपक म्हणून त्याला मी नावाजतो.


Pg 14

    तके सर्व ऎकुन शारंगधर श्रीविष्णूंना रहावले नाही, तत्क्षणी ते स्वतः त्या गुरु व शिष्य, दोघांचा हा काय प्रकार आहे? बघण्यास उत्सुक होऊन पहावयास गेले असतां त्याला, विश्वनाथाने जे सांगितले, त्याहूनही अधिकच, भक्तीचा, थक्क करणारा, जणू एक स्त्रोतच पहावयास मिळाला. हृषीकेशी श्रीविष्णू ते पाहून इतका प्रसन्न झाला, कि त्याला रहावले नाही, लगेच त्याने दीपकला बोलावून, त्याला म्हणू लागला, हे संदीपक संतोष झाला, तुझ्यावर मी प्रसन्न झालो, तुला काय वर पाहिजे? तो माग, मी तो वर तुला देण्यास तत्पर आहे.
    हृषीकेशी श्रीविष्णूंचे दर्शन होतांच, त्यांना प्रणाम करून, दीपक म्हणाला, अशी काय व कोणती भक्ती मी केली, किंवा असे कोणते कार्य मी केले? कि तुम्ही मला प्रसन्न होऊन वर देत आहांत? काही लक्ष, काही सहत्र वर्षे, अरण्यवासी होऊन जे जप व तप करतांत, हे नारायणा, त्यांना तर तुम्ही उदास ठेऊन, वर देत नाही. मी तर तुम्हाला भजत नाही कि तुमची भक्तीही करत नाही. कधी तुमचे नामस्मरण केलेले नाही, किंवा केलेल्याचे मला स्मरतही नाही. कधी कुठल्याही मंदिरात नित्यनेमाने जाऊन दर्शनही करत नाही. मग येउन जबरदस्तीने मला कशाकरता आणि काय म्हणून वर देतो असे आपण म्हणता?
    संदीपकचे बोल व प्रश्न ऎक्न, स्वयं नारायण अतिशय संतोष पावला, व दीपकला समजावून विस्तारपूर्वक सांगू लागला, निश्चयपूर्वक संपूर्ण निर्णयाप्रत येईल एव्हढी पूर्णरूपाने तूझी गुरुभक्ती पाहून आम्हाला संतोष झाला. तू जी भक्ती व सेवा आपल्या गुरूची केलीस ती आम्हालाच पावली. जो मनुष्य, आपल्या सत्गुरुंचा भक्त असेल, तोच माझा जीवप्राण इतका प्रिय असतो. त्यालाच मी वश्य होतो व ज्या ज्या गोष्टींची तो कामना करून मागतो, त्याला मी ते ते देतो. जो मनुष्य आपल्या मातापित्याची सेवा पूर्णपणाने करतो, ती सेवा देखील तत्वतः मलाच पावते. ज्या स्त्रिया पतिसेवा करतांत, तीही सेवा मलाच पावते. एखाद्या सत्पात्री भल्या ब्राह्मणाला, यति, योगी, तपस्वीला केलेले नमन सुद्धा मलाच पावते.
    स्वयं नारायणाचे हे उपदेशपर बोल ऎकुन, संदीपक परत नमन करून, विनवू लागत म्हणाला, हे नारायणा, वेदशात्र व त्याची मीमांसा ह्याप्रमाणे, मी निश्चितपणे जाणतो, व मी माझ्या मनाशी निश्चय करून ठाम आहे कि माझा गुरुच मला देणारा आहे. सत्गुरू पासूनच सर्व ज्ञान प्राप्त होते, त्रयमुर्ति देखील त्यांच्यामुळेच आम्हाला अधीन होतंत, त्यामुळे माझा गुरूच माझा देव होतो व आहे. सर्व देव, सर्व तीर्थ, मला माझ्या गुरुचरणीच मिळते, हे सत्य आहे, तर परमार्थ कसा आणि किती लांब राहू शकेल? समस्त योगी, सिद्ध, ज्ञानी जन कोणीही गुरुवांचून सज्ञान होऊ शकत नाही कि शकला नाही, तर त्याच ज्ञानाचा उपयोग केला असतां, आपण त्रयमुर्ति ईश्वर कसे माझ्यापासून लांब राहू शकता? त्यायोगे पाहिले असतां, जो वर तुम्ही मला द्याल, त्यापेक्षा माझा श्रीसत्गुरू मला बरेंच काही जास्तच देतो, ह्याच कारणाने मी माझ्या श्रीसत्गुरुरायाला वंद्य मानून, गुरुंनाच भजणे इष्ट मानतो व माझ्या गुरुंनाच भजतो.
    संदीपकचे दृढ वचन ऎकुन, श्रीविष्णू आता अधिकच प्रसन्न झाले, व संतोष पावून म्हणाले, मी धन्य धन्य झालो आहे, माझ्या बाल संदीपका तू तर माझाच प्राण, व माझेच बालक आहेस, तूच शिष्यांमध्ये शिरोरत्न म्हणून ह्यापुढे ओळखला जाशील, आता मी तुझ्यापाशी आलेलोच आहे, तर काहीतरी माग, मला तत्वतः काही द्यावंच लागेल, विश्वनाथ स्वतः आले, दुसऱ्यांदा वर द्यायला मी आलो, निर्धार करून सांगतो, तुला मी पूर्ण वश झालो, माझे मन तुझ्यावर पूर्ण संतोषले, जे काही पाहिजे, व मागशील ते आता देईन.
    प्रत्यक्ष स्वयं नारायण, शिष्य संदीपकला काहीतरी माग म्हणून म्हणू लागले, काय त्या शिष्योत्तमाचे गोडवे गावे, असेच श्रीविष्णूंना वाटू लागले. नारायणाचे बोल आज्ञा म्हणून परवान करून दीपक बोलू लागला, जर मला काही एक वर द्यायचाच असेल, तर माझी, माझ्या मनाशी ठाम राहून, गुरुभक्ती आता करतो त्यापेक्षा अधिक कशी होईल, अजून कशी दृढ होईल, ह्याचे ज्ञान मला द्यावे. गुरूंचे मन कसे ओळखावे? त्यांना अधिक सुखी कसे ठेवता येईल? असे ज्ञान मला द्यावे, असे म्हणत श्रीविष्णूच्या चरणी लागला.
    श्रीविष्णूंनी, त्या शिष्योत्तम संदीपकास त्याप्रमाणे वर, आशीर्वाद म्हणून देत, संतुष्ट स्वराने बोलू लागत म्हणाले, अरे दीपका हे शिरोमणी, तू तर माझा प्राणसखाच झालास, तू आपल्या गुरूला ओळखलेस, ह्याच देही परब्रह्माला पाहिलेस, तरीही आणखी गुरुभक्ती व त्यांचे ज्ञान विचारतोस, तर एकचित्त होऊन ऎक, आपल्या लौकिकाला सार्थ करणारी जशी सुबुद्धी ठेऊ, तशी धर्माधर्मसुमने (धर्म, अधर्म ह्यांची वेदांतील वचने) मनाला वाटू लागतांत, तू तर उत्कृष्ठाहून उत्कृष्ठ अशी, तुझ्या गुरूची स्तुती करत रहा. ज्या ज्या वेळी आपल्या गुरूंची स्तुती करशील, ती आमचीच स्तुती असेल, व त्यामुळे आम्ही तुझ्यावर अधिकच संतोषी राहू. जे जन दुसऱ्यांना ज्ञान सांगत, उत्कृष्ठरित्या वेदान्तभाष्य अहर्निश करतांत, तसेंच जे जन उत्कृष्ठ वेदपठण करतांत, ती निर्धारपणे (निश्चितपणे) आम्हालाच पावते. जे जन वेदांना सिद्धांत जाणून, गुरूला परब्रह्म असे म्हणत, आपल्या गुरूलाच भजतांत, त्याना सर्व देवता वश्य होतांत. गुरु हि दोन अक्षर, पण सत्य जाण, हा अमृताचा अथांग समुद्र असून, त्यांमध्ये बुडाल्याक्षणी काय होईल? त्याला तर स्वर्गगतीच प्राप्त होईल, ज्याचे हृदयी नित्य गुरु स्मरण असेल, त्याला सगुण (मानव देहांत) असतांनाच, अमृतपान करावयास मिळून, तिन्ही लोकांत पुज्य राहून, तो शिष्य अमरत्वाला पोहोचतो. कोणताही वर मी दिला काय, कि विश्वनाथाने दिला, किंवा ब्रह्माने दिला, तरी तो वर घेण्याला लायक बनवणारा, फलदाता होणारा, महानाहुन महान बनविणारा, गुरूच असतो, म्हणूनच गुरु हाच त्रयमूर्ती आहे, हे जाणून घे. असे उपदेशून, श्रीविष्णूने परम संतोषाने दीपकला वर दिला.
    रमेश्वराने कलीला पुढे कथा सांगणे चालू ठेवत म्हणाला, शिष्य संदीपक वर मिळाल्यावर, आपल्या गुरुंजवळ गेला असतां, वेदधर्म मुनी, त्याला विचारू लागले, ऎक माझ्या शिष्या कुलदीपका, वैकुंठ नायकांनी काय तुला दिले, ते मला विस्तारपूर्वक सांग, जेणेकरून माझे दोलायमान मन स्थिर होईल.
    संदीपक आपल्या गुरूला सांगू लागला, हृशिकेशींनी मला वर दिला, मी त्यांच्याकडे, माझे अंतःकरण ठाम राहून, तुमच्या चरणी माझी भक्ती अधिक दृढ होऊन, तुमची सेवा अधिक चांगली, अधिक व्यवस्थित, व अधिक तत्पर करता येउन द्यावी, असा वर मागितला.
    पल्या शिष्याचे ऐकून तो गुरु, वेदधर्म मुनी, साक्षात्कार होऊन प्रसन्नचित्त होऊन म्हणाला, हे शिष्या, काशीपुरी राहून तू आपल्या जीवनाचे उद्धार करून घेतले. तुझे प्रत्येक वाक्य ह्यापुढे सिद्ध राहील, तुझ्या घरी नवनिधी (नवसिद्धी) पाणी भरतील, प्रत्यक्ष विश्वनाथच तुझ्या अधीन झाला. तू तुझे जीवन सफल करून घेतलेसच त्याच बरोबर तुझे स्मरण जे कोणी करतील, ते तुझ्या स्मरणमात्रने, त्यांचे सर्व कष्ट निवारण होऊन, ते त्यांच्या स्त्रिया व पुत्रांसमवेत सुखी नांदतील.
    व्हढे बोलून होतांच, तो गुरु वेदधर्म मुनींचा देह, तत्क्षणी दिव्य देहांत रुपांतरीत झाला. तो गुरु, फक्त आपल्या शिष्याचा आपल्याप्रती भाव बघण्यास, त्याने सर्वांगावर कुष्ठ घेऊन, त्या व्याधीचे सर्व क्लेश सहन केले. तो तर महातपस्वी होता, त्याला कसले पाप होते व रहाणार आहे, तो तर लोकानुग्रह (दुसऱ्यांचे कल्याण) करण्यासाठी काशीपुरी गेला होता. काशी नगरीचा महिमाच आहे कि हजार जन्मांचे पाप, तेथे धुवून जाइल.
    शाप्रकारे दीपक आख्यान सांगून, परमेश्वराने त्या गुरुशिष्याची कथा संपवली, व समय येतांच कलीला पृथ्विलोकी जाण्याची आज्ञा दिली, व प्रस्थान करण्यास सांगितले.


आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

Sunday, September 13, 2015


पान नंबर ११ व १२
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 11
              सुविचार
हाताने, फेकलेला एक दगड, साधारण १०० फुट दूर जातो,
बंदुकीतून निघालेली गोळी, १००० फुट दूर जाते,
तोफेचा गोळा, ५ मैल दूर जातो,
अजूनही विज्ञान आधारे हजारो मैल दूर जाणारे क्षेपणास्त्र निर्माण होईल,
परंतु
एका गरिबाला, दिलेला एक भाकरीचा तुकडा,
स्वर्गाच्या दरवाज्यापर्यंत जातो.


    ह्यांनंतर, श्रीमद्सद्गुरू नृसिंहसरस्वतीजींनी, परमेश्वराने कलीला सांगितलेली, त्या चित्पावन सत्गुरुंची व त्याच्या शिष्योत्तमाची सांगितलेली कथा, आपल्या ओघवत्या रसाळ वाणीने परमेश्वराच्याच शब्दांत सांगण्यास सुरवांत केली.
    हे कली, त्या शिष्योत्तमाची कथा, तुला विस्तारपूर्वक सांगतो ती लक्ष्यपूर्वक ऎक, पूर्वी गोदावरी नदीच्या तीरी, ऎका थोर, आंगिरस नांवाच्या मुनींचा आश्रम स्थित होता, तेथेच वेगवेगळ्या, नानापरींचे वृक्ष, लता असतांना, पुण्य जातींचे मृग (हरीण) देखील वास करीत होते. तसेंच तेथे अनेक ब्रह्मर्षी देखील वास करून, तप व अनुष्ठान करायचे. त्यांतच एक "वेदधर्म" नावाचा, ब्राह्मण मुनी, ज्याच्याकडे अनेक शिष्य, वेदशास्त्र अभ्यास करायचे. त्यांतच एक "दीपक" नावाचा शिष्य, जो शास्त्रपुराणांत पारंगत असून, त्याच्या गुरुप्रती सेवाधर्मांत नेहेमी पुढेच रहायचा.
    क दिवशी, ह्या वेदधर्म ब्राह्मणाने, आपल्या सर्व शिष्यांना फक्त संदीपकला, सोडून बाकी सर्वांना, एकत्र बोलावून, प्रसन्नचित्त म्हणाला, हे माझ्या शिष्यगणहो, जर तुमचे माझ्यावर प्रेम असेल, तर तुम्ही मी जे सांगेन, ते ऎकाल? असे सर्व शिष्यांना विचारले.
    त्यांवर सर्व शिष्य एकसुरांत म्हणाले, तुम्हीच आमचे तारक आहांत, तुम्ही जी काही आज्ञा द्याल, ती आम्ही गुरुवचन मानून निश्चित पाळू, ह्याचा विश्वास ठेवा. आम्हाला माहित आहे, जो आपल्या गुरूंचे वाक्य पाळत नाही, तो नरक सारख्या रौरवांत पडून, त्याची सर्व विद्या संपुष्टांत येउन, ह्या मायासागरांत बुडून नामशेष होतो. मग त्याला कसली गती, तो तर नरकांत कायमचा खितपत पडणार. सत्गुरू हाच, ह्या सर्व परिस्थितींचा तारक आहे, हे तर वेदपुराणांत लिहिलेले व विख्यांत आहे.
    हे सर्व शिष्यांचे एकमुखाचे बोलणे एकुन, तो वेदधर्ममुनी संतोषला, आता त्याने, शिष्य संदीपकलाही बोलावून घेतले, व सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाला, तुम्ही माझ्या सर्व शिष्यानो, लक्ष देवून ऎका, माझे स्वतःचे अशी काही पूर्वार्जित आहेत, जी माझ्या पूर्वजन्मी, जन्मांतरीची सहत्रांपेक्षा अधिकच महापातक मी केली असतील जी मला ज्ञात नाहीत अशी, त्यांकरता मी आत्तापर्यंत अनेकविध यज्ञ केले व अनुष्ठान केली, बरीच पातक त्यांत धुवून गेली, परंतु काही बाकीच राहिली, जी भोगल्याशिवाय त्याचा उपचार होणार नाही असे मला दिसून आले व त्याची जाणीव झाली. तपसामर्थ्याने, आपण पापांच्या भोगांची निष्कृती करतो, म्हणजेच आपण हे भोग काही काळ पुढे ढकलतो, परतू हे पाप आपल्याला मोक्ष मिळायच्या आड कायम, येतच रहाते, त्याच्याकरता मी निश्चय केला, कि हे भोग, आता भोगूनच संपवायचे, त्याशिवाय ह्या उरलेल्या पापांची निष्कृती होणे शक्य नाही. आता ह्यासाठी, अखिल शास्त्रांत ज्याप्रमाणे लिहिले आहे व सांगितले, त्याप्रमाणे वाराणसी नगरी जाउन, मी स्वयं हे भोग माझ्या देही भोगू इच्छितो, फक्त त्यावेळी माझ्या जर्जर अवस्थेमध्ये मला कोणीतरी सांभाळावे लागेल, तरी समस्त तुमच्यामध्ये, असा कोण आहे, जो हे कार्य आनंदाने स्वतः होऊन स्वीकारेल व अंगीकारेल? (करण्यास तयार होईल?)
    त्यावेळी, तत्क्षणी त्या शिष्यांमधला एक शिष्य, ज्याचे नांव संदीपक, विवेक ठेवत, प्रणाम करून, गुरुमुख पहांत आपल्या गुरूला म्हणाला, पाप करणे हे तर निश्चितच स्वदेहाचा नाश करणेच आहे, म्हणूनच ह्या पापांचा म्हणजेच ह्या दु:खांचा संग्रह (डोंगर) ठेवणे वृथाच आहे, म्हणूनच शीघ्र (लवकर) ह्याचा निःपात करणे (संपवणे), हेच योग्य असेल.
    संदीपकचे बोल एकुन, वेदधर्म त्याला म्हणाला, ज्यावेळी मनुष्यांस आपले शरीर दृढ (धडधाकट) असेल, तेव्हांच त्वरित पापक्षालन करावे हे योग्य, नाहीतर ते तर अंगामध्ये विष जोपासून वाढ करणेंच होते, अन्यथा तीर्थ, प्रायश्चित्त करून, उरेल ते लवकरांत लवकर स्वतः आपल्या देही भोग भोगून, पापक्षालन करावे, तोपर्यंत आपणांस मुक्ती मिळणे शक्य नाही. हे कोणीही जरी देव वा साधूमुनिवरांना, मनुष्यांतले ज्ञानी लोकांना म्हणजेच तो कोणीही असला, तरीहि त्याला चुकू शकत नाही, हे निर्विवाद सत्य आहे.
    पल्या गुरूंचे बोल मनांत साठवत, शिष्य संदीपक म्हणाला, स्वामिनाथा, आपण निश्चित, आपला माझ्यावर भंरवसा असून द्यावा, जे काही कार्य असेल ते काहीही अनुनयविनय (तमा, संकोच) न बाळगता मला सांगावे, माझी यथाशक्ति, मी आपली सेवा करेन, व त्यांकरता सदैव तुमच्या सेवेला व मदतीला कायम हजर राहीन.
    हे शिष्य संदीपकचे वचन ऎकुन, गुरु वेदधर्म म्हणाला, मी हे भोग भोगण्यादरम्यान, सर्वांगावर कुष्ठ होऊन काही अंग कार्यहीन होतील, माझ्या डोळ्यांवर परिणाम होऊन, मी कदाचित आंधळा व पांगळा देखील होईन, ह्या भोगांचा काळ थोडा नाही, तर एकवीस वर्षे असणार आहे. मला कायम पुष्कळ सांभाळावे लागेल, म्हणूनच जर तू तुझ्या मनी दृढ असशील, तरच ही माझी सेवा स्विकारावीस असे माझे सांगणे आहे.


Pg 12
कृपया हिकडे लक्ष्य द्यावे!
पाणी, हि आपल्या, जीवनाची सर्वांत मोठी गरज आहे. पाण्याला, जास्त आहे किवा जास्त मिळते, म्हणून वाया घालवू नका. पाणी हे परमेश्वराचे आपल्याला वरदान आहे. आपण, त्या वरदानाची कदर करत नाही, व ईश्वराच्या, निसर्गाच्या, प्रकोपाचे मात्र धनी होतो.
जरूर ध्यानांत ठेवा, व इतरांनाही अवश्य सांगा:
पाणी पितांना, दांत घासतांना, हात धुवतांना, भांडी घासतांना, आपण, किंवा अन्य कोणी जर पाण्याचा नळ, पूर्ण उघडून पाणी गरजेपेक्षा जास्त सोडले, तर आवश्यकतेपेक्षा तिप्पट, ते चौपट पाणी निव्वळ वाया जाते. तेच पाणी एका भांड्यात घेऊन वापरले असतां, असे लक्ष्यांत येते, कि पाणी फक्त २५% च लागले. आता आपण सर्वांनी, हेच पाणी असेच वाचवले, तर आज महाराष्ट्रांत, सर्व शहरांत व गावांत, एवढे पाणी वाचेल, कि संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्ध्या शेतीच्या पिकांना, ते पाणी पुरवून, महागाई कमी होण्यास मदतच होईल. शेतकऱ्यांना मदत होऊन, त्यांना आत्महत्या करावी लागणार नाही.
तरी जो कोणी किंवा आपण स्वतः, चुकत असाल, तर आपल्या स्वतःवर व सर्व महाराष्ट्रावर कृपा करा, व चुकणाऱ्याची चूक कृपया त्यांच्या लक्षांत आणून द्या.
आ. अशोक यादव.

    पल्या गुरूंचे म्हणणे ऎकुन, शिष्य संदीपक, निष्ठेने दृढचित्त होऊन म्हणाला, स्वामी गुरुराया, तुम्ही तुमचे हे सर्व पापभोग, मला द्या. मी आनंदाने कुष्ठी होण्यांस तयार आहे, एकवीस वर्ष आंधळा होऊन, तुमच्या पापांचे जे काही भोग असतील, ते भोगून सर्व पापनिष्कृती करेन, हे निश्चित आहे. तुम्ही लवकर हे कार्य माझ्यावरच सोपवा, आणि त्यायोगे, तुमचे सर्व पापहरण होईलच, ह्यावर निःसंदेह विश्वास ठेवा, असे म्हणतंच आर्जव करत, संदीपक आपल्या गुरुंच्या चरणी लागला.
    हे आपल्या शिष्योत्तम संदीपकचे बोलणे ऎकुन, गुरुर्षी वेदधर्म मुनी संतोषून, आपल्या पापांच्या भोगांची लक्षणे सांगत, म्हणाले, स्वतःचे पाप स्वतःलाच भोगावे लागते, ते कुणाही पुत्राला किंवा शिष्याला, ग्रहण करता येत नाही, आणि जर आपण स्वदेही नाही भोगले, तर हे पाप आपण वेचुच शकणार नाही, तो फांस आपल्या गळ्याला कायमचा रहाणार. ह्याकारणाने, मी माझ्या पापदु:खांना कसेही भोगेन, प्रिय संदीपक एकवीस वर्ष तू माझा सांभाळ करणे. जे मनुष्य रोगपीडित होतांत, त्यांच्यापेक्षा त्यांचा सांभाळ करणारेच जास्त कष्टी होतांत हेच सत्य आहे, म्हणून माझ्यापेक्षा जास्त कष्ट, हे संदीपक, तुलांच होणार आहेत, हे ध्यानांत ठेव. ह्याकारणाने निश्चयपूर्वक मी माझे भोग भोगेन, मला काशीनगरी नेउन माझा सांभाळ कर. काशीपुरी जाउन जेव्हा पापावेगळा होईन, शाश्वतपद पावेन, तेव्हां हे शिष्योत्तमा हे तुझ्याकरताही निश्चित पुण्यच असेल.
    संदीपक गुरूंची सेवा करायला मिळणार म्हणून आनंदून म्हणाला, हे गुरुवर, अवश्य तुम्हाला काशीपुरी घेऊन जाउन, तुमची एकवीस वर्ष, विश्वनाथाप्रमाणे सेवा करेन.
    ही कथा सांगतांना, मध्येच, परमेश्वराने कलीला विचारले, कसा वाटला, व कसा शिष्य होता त्या गुरुंचा? परमेश्वराच्या प्रश्नांवर, कली कांहींच बोलला नाही, त्याला तर उत्कंठा होती, पुढे काय काय वर्तले त्याची.
    रमेश्वराने, पुढे आपले कथाकथन चालू ठेवंत म्हणाला, आपल्या गुरूस, कुष्ठ रोगाची लागण होतांच, संदीपक त्यांना त्वरित काशीपुरी घेऊन गेला. उत्तरदेशांत मणिकर्णिकेला, कम्बळेश्वर जवळ, हे दोघे गुरुशिष्य, राहू लागले. त्यांचा रोजचा दिनक्रम, मणिकर्णिका नदीवर जाउन स्नान करणे, तेथून पुढे काशी विश्वेश्वराची पूजा करणे, असे करत तो मुनी (गुरु) आपले प्रारब्धयोग त्या स्थानी भोगू लागला. जसजसे दिवस जाऊ लागले,त्या मुनींचा कुष्ठरोग पुष्कळ वाढून, डोळ्यांनाही आंधळेपण येउन, त्यांची अवस्था फारच केविलवाणी व दु:खमय झाली. अशाही अवस्थेत, शिष्य संदीपक, त्यांची सेवा पूर्ण भक्तिपूर्वक करंत होता. आणखी काही दिवस उलटल्यांवर, त्या वेदधर्म मुनींचे सर्वांग कुष्ठ रोगाने व्यापून टाकले, व त्यांतून पु वाहून, किडेही पडू लागले, त्यामुळे त्यांची अवस्था अधिकच दु:खीकष्टी होऊन त्यांना अपस्माराने पार ग्रासून टाकले.
    शिष्य संदीपक, नित्य उदरभरणासाठी, भिक्षा मागून आणी व आपल्या गुरूंना देत असे, व आता काशी विश्वेश्वराची पूजा करण्यांस न जाता, आपल्या गुरुंनाच काशी विश्वेश्वर स्वरूप मानून, त्यांची एकभावाने पूजा करून, नित्य त्यांच्या सेवेस हजर राहू लागला.
    ता परिस्थिती अशी झाली, कि मनुष्यास रोगाने पिडले असतां, साधा माणूस असो, ब्राह्मण असो कि साधुजन असो, अशा अवस्थेमध्ये काहिएक वेळी तो अत्यंत लहरी, संतापी, चिडचिडा तसेच त्यायोगे त्यांचे भान जाऊन क्रूर होणे साहजिकच होते.
    सेंच त्या मुनींचे झाले, एखादे दिवशी, शिष्य संदीपकने भिक्षा आणली असतां, मुनी वेदधर्म, आज भिक्षा कमीच का आणली, म्हणून स्वतःलाच क्लेश करून. आणलेली भिक्षा जमिनीवर सांडून देत, तर कधी, भिक्षा जास्त का आणली, पण त्यांत मिष्टांन्न का नाही आणले म्हणून क्लेश करत रहायचे. काही दिवसांनी तर रोजच पक्वान्न का आणत नाहीस? मला असले साधे अन्न गिळण्याकरता तोंडाला चव नाही असे म्हणत अत्यंत कोपिष्ट होऊन, शाक भाज्यांची व मिष्टांनाची मागणी करत, शिष्य संदीपकला मारावयास धावू लागले. कधी तर, आणलेली सर्व भिक्षा वाया घालवून देत, रागारागाने अपशब्द व शिव्यांचा भडीमार करायचे. तसेच एखादे समयी, अत्यंत भावुक होत, आपल्या शिष्याला जवळ बसवून, म्हणू लागत, तूच माझा ज्ञानराशी, माझ्या कारणानेच कष्टत आहेस, तूच माझा शिष्यराया, शिरोमणी आहेस, असे म्हणत, परत तीक्ष्ण स्वराने म्हणू लागत, मी आता खूपच गांजलो, मला उठता येत नाही, तू माझे मलमुत्र का वरचेवर धुवत नाहीस? माझ्या जखमांवर वारंवार माशा बसून माझेच शरीर खात रहातांत, त्यांना तू का उडवत नाहीस? माझी सेवा करेन म्हणून म्हणत होतांस? व तसे मला वचन दिले होतेस, मग पाहिजे तशी भिक्षा का आणत नाहीस? असे नेहेमीच काही ना काहीतरी म्हणून वेदधर्म मुनी, स्वतःला संताप करून, शिष्याला देखील प्रताडीत करायचे, आणि अशी वेळ वारंवार येत होती तसेच हि वेळ तर नेहेमी शिष्य संदीपकची सहनशीलतेची पराकाष्ठाच असायची.

पुढील कथा पुढे प्रसिद्ध होणाऱ्या पानीं वांचू शकता.


आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.